शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भामा आसखेड जलवाहिनीचे काम बंद पाडल्याप्रकरणी १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १८ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 00:18 IST

मागण्या मान्य करत नसलेल्या शासनाचा निषेध करत जलवाहिनीवर बसून आंदोलकांनी काम बंद पाडले...

ठळक मुद्देबेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी ११५ जणांना शांततेचा भंग व त्याबाबत समज आणि ताकीद देऊन सोडून देण्यात आले.

आसखेड: भामा आसखेड धरणावरून पुण्याला नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम धरणग्रस्तांनी सोमवारी( दि.३१ ) बंद पाडल्याने सायंकाळी सुमारे १३३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली. पैकी १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर ११५ जणांना शांततेचा भंग व त्याबाबत समज आणि ताकीद देऊन सोडून देण्यात आले , अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

   भामा आसखेड धरणामधून पुण्याला देण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम (दि.१४ ऑगस्ट ) पोलीस बंदोबस्तात सुरू केले होते. परंतु, विविध मागण्यांसाठी धरणग्रस्तांचे कित्येक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करत नसलेल्या शासनाचा निषेध करत जलवाहिनीचे पाईपलाईनवर बसून आंदोलकांनी काम बंद पाडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केली. याप्रकरणी २७ जणांवर कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामा आसखेड धरणातून पुणे शहराकडे पाणीपुरवठ्याची पाईपलाईन केली जात आहे. त्याचे काम सुरु आहे. खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे या पाइपलाइनचे काम सुरु आहे. कामाच्या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून पाईप लाईनच्या कामाजवळ येऊन घोषणाबाजी केली.  आणि गबाजी सातपुते या वृद्धास गाडीच्या दरवाज्याच्या बाजूला हेतुपूर्वक ढकलून देऊन मारण्याच्या प्रयत्न आंदोलकांनीच केला अश्या आरोपाने तसेच तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस शिपाई के .यू .कराड आणि सहाय्यक फौजदार एस .आर .वाघुले यांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

यामध्ये पोलीस कर्मचारी कराड यांच्या गणवेशाची बटणे तुटली. तर सहाय्यक फौजदार वाघुले यांच्या हाताला व पायाला मार लागला. आंदोलकांनी जलवाहिनीचे काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी १८  जणांना अटक केली आहे. १८ पैकी ९ जणांची जामिनावर सुटका करण्यात आली.  तर अजय नवले(रा. वाहागाव ता. खेड), शिवाजी राजगनरव(रा. आखतुली ता. खेड) ,रामदास होले(रा. कासारी ता. खेड), सुनील भालशिंग(रा. कोळीये ता. खेड), दत्तू शिवेकर(रा. शिवे ता. खेड), अरुण कुदळे(रा. देवतोरने ता. खेड), नवनाथ शिवेकर (रा. शिवे ता. खेड), तान्हाजी डांगले (रा. पराळे ता. खेड), गणेश जाधव (रा. गावरवाडी ता. खेड) आदी९ जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस ठाण्याने दिली. चाकणचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश राठोड पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDamधरणState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी