शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Maharashtra | उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कृषी अधीक्षकपद रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:49 IST

निवृत्तीच्या आदल्या दिवशी पदोन्नतीचे आदेश...

- नितीन चाैधरी

पुणे : राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल १८ जिल्ह्यांमधील जिल्हा कृषी अधीक्षक हे पद रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे. कृषी विभागातील अतिशय महत्त्वाचे असलेले जिल्हा कृषी अधीक्षक पद रिक्त असल्याने अनेक कामे रखडली असून, याचा मोठा परिणाम कामकाजावर होत आहे.

नंदूरबार जिल्ह्याचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे तर पालघर, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यातील हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. दुसरीकडे गेल्या पाच महिन्यांपासून पदोन्नती दिल्यानंतरही कृषी उपसंचालकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचा पदभार न दिल्याने हे अधिकारी हवालदिल झाले आहेत.

राज्यात कृषी आयुक्तालय असलेल्या पुण्यासारख्या जिल्ह्यासह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे पद रिक्त आहे. त्यामुळे १८ जिल्ह्यांचा कारभार कृषी उपसंचालक किंवा प्रकल्प व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हे पद रिक्त आहे. पालघरमधील पद एक वर्षापासून रिक्त आहे. नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे येथेही या पदाचा कारभार प्रभारीच हाकत आहेत. विदर्भातील अमरावती विभागात अमरावती, बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाला या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात अपयश आले आहे. तर नागपूर विभागातही खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यासह वर्धा व भंडाऱ्यातही हे पद प्रत्येकी वर्षभरापासून रिक्त आहे. कृषी विभागातील जिल्ह्याचे हे प्रमुख पद असते. त्यामुळे अनेक मान्यता, योजनांची अंमलबजावणी, कृषी विस्तार अशा अनेक कामांवर परिणाम होत आहे. मात्र, त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कृषी अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला आहे.

पुण्याचा कारभारही प्रभाऱ्यांच्या हाती

पुणे विभागात खुद्द पुणे जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून हे पद राष्ट्रीय उद्यानविद्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकांकडे देण्यात आला आहे. या विभागातील सातारा, कोल्हापूर व सांगली या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्येही प्रभारीच कारभार चालवत आहेत. औरंगाबाद विभागातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद जिल्ह्यात व जालन्यातही हीच परिस्थिती आहे. तर नांदेड विभागातील उस्मानाबादमध्ये हे पद १६ महिन्यांपासून प्रभारींच्या खांद्यावर आहे.

पाच महिन्यांपूर्वीच पदोन्नती, पण...

राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये ८१ कृषी उपसंचालकांना पदावरून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तसेच प्रकल्प व्यवस्थापक, आत्मा या पदांवर पदोन्नती दिली. वास्तविक पदोन्नतीची शिफारस केल्यावर साधारण महिनाभरात पदस्थापना देण्याचा प्रघात आहे. मात्र, पाच महिने उलटले तरीही हे अधिकारी राज्य सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहेत. एकीकडे १८ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे पदस्थापनेसाठी अधिकारी वाट पाहत आहेत. अशी अवस्था सध्या कृषी विभागाची झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाला वाली उरलाच नसल्याचे चित्र आहे.

निवृत्तीच्या आदल्या दिवशी पदोन्नतीचे आदेश

सरकारने १० वर्षांनंतर ही पदोन्नती दिली. मात्र, यातील दोन जणांचा अपवाद वगळता अन्य अधिकाऱ्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. पदस्थापना मिळालेल्या दोघांना त्यांच्या निवृत्तीच्या आदल्या दिवशी अर्थात ३० डिसेंबरला पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. आता ३१ जानेवारीला यातील दोघे निवृत्त होत आहेत. त्यांनाही आदल्या दिवशी असेच आदेश मिळण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत. आणखी दोघे मेमध्ये निवृत्त होणार आहेत. यामुळे पदस्थापना न देता केवळ पदोन्नती कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेतीAbdul Sattarअब्दुल सत्तारPuneपुणेnagpurनागपूरAurangabadऔरंगाबाद