शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:16 IST

मराठवाडा बोगदा प्रकल्पाचे काम थांबवा; धरणग्रस्त कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

इंदापूर : निरा भिमा स्थिरीकरण अंतर्गत निरा खोऱ्यातून उजनी जलाशयाचे पाणी मराठवाड्यास देण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी निरा ते उजनी जलाशय व उजनी जलाशय ते सिना कोळगाव धरणापर्यंत (ता. परांडा) कालव्याचे काम सुरु झाले आहे. या कालव्यातून मराठवाडा भागासाठी देण्यात येणारे पाणी पावसाळ्यातच उजनी जलाशयातून लगेच पुढे मराठवाड्याकडे नेले जाणार आहे. उजनी धरणातील मृतसाठ्यातील पाणी देखील जाणार असल्याने पाण्याचे नियोजन कोलमडून पडणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या जमिनी, शेती गेली त्यांच्यावर अन्याय होणार आहे.हे पाणी उजनी धरण ३० टक्के भरल्यानंतर म्हणजेच जलाशयाची पातळी ४९३ मीटर झाल्यानंतरच प्रवाही होणार आहे. त्यासाठी या कालव्याची पातळी ४८७ मीटर इतकी घेतली आहे. म्हणजेच धरणातील मुख्यकालव्याच्या तळपातळीपेक्षा ही खाली ठेवली गेली आहे. वास्तविक पहाता जलशास्त्राचा अभ्यास केल्यास ४९३ मीटरच्या वरील पाणी पुढे जाण्यासाठी ४९२ सुरवातीची तळपातळी पुरेशी आहे. मात्र ही पातळी ४८७ घेतल्यामुळे उजनी धरणातील जिवंत व मृतसाठ्यातील पाणी मराठवाड्याकडे नेहण्याचा उद्देश सरळ दिसून येत आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यास पाणी कमी पडणार असून त्यांचे पाणी नियोजन कोलमडून, कोट्यावधी रूपयांचे नुकसान होणार आहे. तसेच ज्यादा खोलीवरून कालवा खोदल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत.उजनी धरणाची पुर्ण संचय पातळी ४९६. ८२ असून धरणाची पाणी साठवण क्षमता ११६.२३ टीएमसी इतकी आहे. धरणाच्या मुळ प्रकल्प अहवालात नियोजित असलेल्या सिंचन क्षेत्रासाठीच्या कालव्याची सुरवातीची पातळीमुख्य कालवा - ४८७.२०भिमा सिना जोड कालवा बोगदा सुरवातीची तळ पातळी - ४८८.२०,सिना माढा उपसा सिंचन योजना पाणी उचलण्याची सर्वात खालची पातळी ४९१.०३ मीटर,धरणाची पाणी वापराची कमीतकमी पातळी (एमडीडीएल) ४९१.०३ मीटर आहे.यातील पाणी कमी झाल्यास उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाºया बºयाच शेतकºयांचे नुकसान होणार आहे.उजनी धरणातील पाणी मूळ लाभधारक शेतकºयांना मिळत नाही. अक्कलकोट व मंगळवेढा या कालव्याच्या शेवटच्या भागात अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. नियोजनात समाविष्ट केलेल्या नऊ उपसा सिंचन योजना अद्याप अपुर्णावस्थेतच आहेत.नवीन नियोजनात नसलेल्या बोगद्याची सुरवातीची तळपातळी ४८७ ऐवजी ४९२ रहाणे गरजेचे आहे. अन्यथा सिंचनास देखील पाणी मिळणार नाही व शेतकºयांचे नुकसान होईल. सध्या मराठवाडा बोगद्याचे २९ किलोमीटरचे काम होणार असून सदर काम ताबडतोब थांबविणे गरजेचे आहे. सहा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतील तसेच शेतकºयांनी वेळीच जागे न झाल्यास त्यांचे नुकसान होणार आहे.त्यामुळे या बोगद्याचे काम त्वरित न थांबविल्यास धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती उजनी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरDamधरणwater shortageपाणीटंचाई