शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 13:13 IST

प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना उत्पादन बंदचे आदेश

ठळक मुद्देसांडपाणी सोडणाऱ्या विश्वा लॅबोरेटरीला नोटीस : प्रदूषणाच्या पातळीने सर्व स्तर ओलांडलेवसाहत बनली नागरिकांची डोकेदुखीऔद्योगिक क्षेत्रातील कुठलाच उद्योग बंद पडू  चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावर कारवाई होणे आवश्यक

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रदूषण मंडळाला जाग आली असून प्रदूषित रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याच्या कारणावरून विश्वा लॅबोरेटरी प्लॉट नं. डी-३५ या कंपनीलादेखील बंदची नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाणी व इतर माध्यमातून प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना नियमांचे पालन करण्यापर्यंत उत्पादन बंदचे आदेश प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहे. कुरकुंभ येथील प्रदूषणाच्या पातळीने सर्व स्तर ओलांडले असून, येथील नागरी वस्तीला अतिशय घातक अशा प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी व बेजबाबदार प्रकल्प मालक व व्यवस्थापन यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी याचे स्वागत केले आहे. ग्रामस्थांच्या अनेक तक्रारींचा दबाव आल्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दि. २ जानेवारी रोजी विश्वा लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्षात येऊन पाहणी केली होती. यामध्ये हा प्रकल्प सुरु झाल्यापासून जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत रासायनिक सांडपाणी राजरोसपणे चार गुप्त चेंबरच्या माध्यमातून सोडले जात असल्याचे आढळले होते. घातक अशा रासायनिक सांडपाण्याला कुरकुंभ येथील सामूहिक प्रक्रिया केंद्राने देखील घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रकल्प मालक व व्यवस्थापनाने हे सांडपाणी चेंबरद्वारे सरळ बाहेर उघड्यावर सोडण्याचा सपाटा लावला होता. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रदूषण मंडळाला याची दखल घ्यावीच लागली...........वसाहत बनली नागरिकांची डोकेदुखीदौंड तालुक्याच्या व कुरकुंभच्या विकासाच्या आर्थिक जडणघडणीत आपला मोलाचा वाटा उचलणाºया औद्योगिक क्षेत्राकडून तालुक्यातील व परिसरातील कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामस्थांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जसजसे प्रकल्प सुरु होऊ लागले तशा अनेक समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रदूषणाच्या प्रश्नाने सर्वसामान्यांचे जीवनमान नकोसे करून टाकले असताना ग्रामस्थांनी कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करीत लढा उभारला व अनेक वर्षांच्या संघर्षाला आता यश मिळताना दिसत आहे. प्रदूषणाच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रदूषण मंडळाने याची गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली आहे. याचीच प्रचीती म्हणून अगदी आठवड्याच्या फरकाने आधी हार्मोनी व आता विश्वावर कारवाईचा बडगा उगारला आहे. येणाऱ्या काळात प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा मानस प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे............औद्योगिक क्षेत्रातील कुठलाच उद्योग बंद पडू नये अथवा त्यांच्यावर चुकीची कारवाई होऊ नये, असे मत प्रत्येक ग्रामस्थाचे आहे. मात्र, प्रकल्प चालवताना व्यवस्थापनाने सभोवताली वास्तव्य करणाऱ्या नागरिकाच्या जीवाशी खेळून आपला प्रकल्प चालवू नये एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावर कारवाई होणे आवश्यक आहे. या कारवाईचे आम्ही स्वागत करतो.- राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ.............

टॅग्स :Kurkumbhकुरकुंभpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण