शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 13:13 IST

प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना उत्पादन बंदचे आदेश

ठळक मुद्देसांडपाणी सोडणाऱ्या विश्वा लॅबोरेटरीला नोटीस : प्रदूषणाच्या पातळीने सर्व स्तर ओलांडलेवसाहत बनली नागरिकांची डोकेदुखीऔद्योगिक क्षेत्रातील कुठलाच उद्योग बंद पडू  चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावर कारवाई होणे आवश्यक

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रदूषण मंडळाला जाग आली असून प्रदूषित रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याच्या कारणावरून विश्वा लॅबोरेटरी प्लॉट नं. डी-३५ या कंपनीलादेखील बंदची नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाणी व इतर माध्यमातून प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना नियमांचे पालन करण्यापर्यंत उत्पादन बंदचे आदेश प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहे. कुरकुंभ येथील प्रदूषणाच्या पातळीने सर्व स्तर ओलांडले असून, येथील नागरी वस्तीला अतिशय घातक अशा प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी व बेजबाबदार प्रकल्प मालक व व्यवस्थापन यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी याचे स्वागत केले आहे. ग्रामस्थांच्या अनेक तक्रारींचा दबाव आल्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दि. २ जानेवारी रोजी विश्वा लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्षात येऊन पाहणी केली होती. यामध्ये हा प्रकल्प सुरु झाल्यापासून जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत रासायनिक सांडपाणी राजरोसपणे चार गुप्त चेंबरच्या माध्यमातून सोडले जात असल्याचे आढळले होते. घातक अशा रासायनिक सांडपाण्याला कुरकुंभ येथील सामूहिक प्रक्रिया केंद्राने देखील घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रकल्प मालक व व्यवस्थापनाने हे सांडपाणी चेंबरद्वारे सरळ बाहेर उघड्यावर सोडण्याचा सपाटा लावला होता. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रदूषण मंडळाला याची दखल घ्यावीच लागली...........वसाहत बनली नागरिकांची डोकेदुखीदौंड तालुक्याच्या व कुरकुंभच्या विकासाच्या आर्थिक जडणघडणीत आपला मोलाचा वाटा उचलणाºया औद्योगिक क्षेत्राकडून तालुक्यातील व परिसरातील कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामस्थांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जसजसे प्रकल्प सुरु होऊ लागले तशा अनेक समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रदूषणाच्या प्रश्नाने सर्वसामान्यांचे जीवनमान नकोसे करून टाकले असताना ग्रामस्थांनी कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करीत लढा उभारला व अनेक वर्षांच्या संघर्षाला आता यश मिळताना दिसत आहे. प्रदूषणाच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रदूषण मंडळाने याची गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली आहे. याचीच प्रचीती म्हणून अगदी आठवड्याच्या फरकाने आधी हार्मोनी व आता विश्वावर कारवाईचा बडगा उगारला आहे. येणाऱ्या काळात प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा मानस प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे............औद्योगिक क्षेत्रातील कुठलाच उद्योग बंद पडू नये अथवा त्यांच्यावर चुकीची कारवाई होऊ नये, असे मत प्रत्येक ग्रामस्थाचे आहे. मात्र, प्रकल्प चालवताना व्यवस्थापनाने सभोवताली वास्तव्य करणाऱ्या नागरिकाच्या जीवाशी खेळून आपला प्रकल्प चालवू नये एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावर कारवाई होणे आवश्यक आहे. या कारवाईचे आम्ही स्वागत करतो.- राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ.............

टॅग्स :Kurkumbhकुरकुंभpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण