शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सिंहावलोकन २०२२ | राजकारणानेच बिघडवले राजकारण अन् प्रशासनही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत?...

- राजू इनामदार

पुणे : राजकारणच राजकारणाचा खेळ कसा खराब करून टाकते याचे उत्तम उदाहरण यंदाच्या वर्षात जिल्ह्यात पाहायला मिळाले. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊन गेला, अद्याप जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासकराज सुरू आहे. विशेष म्हणजे निवडणुकीबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

आधी आरक्षणाने आणि नंतर प्रभाग कितीचा? या राजकारणावरून हा सगळा खेळ झाला. मुदत संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊन तिथे लोकनियुक्त सदस्यांचे काम सुरू व्हायलाच हवे हा झाला कायदा. तो अस्तित्वात आहे. मात्र, एकूणच सगळे प्रकरण राजकारणात अडकले आणि कायद्याच्याच साहाय्याने शह-काटशह असा प्रकार सुरू झाला. सगळा कारभार प्रशासकांच्या ताब्यात आहे आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेत आहेत. त्यांना अडवायला किंवा जाब विचारायला लोकप्रतिनिधीच नाही अशी स्थिती आहे.

प्रकरण न्यायालयात गेले व तिथेच अडकून राहिले-

ओबीसी आरक्षण कसे द्यायचे या प्रश्नावरून हा विषय सुरू झाला. कोरोनामुळे सन २०२१ ची जनगणना झालीच नाही. त्याही आधी ओबीसींची नक्की संख्या किती याबद्दल वाद होतेच. जनगणनाच झाली नसल्याने हा वाद अधिक वाढला. प्रकरण न्यायालयात गेले व तिथेच अडकून राहिले. कसेबसे ते सुटले तर राज्यात सत्ताबदल झाला.

राजकारणी प्रभाग रचना बदलण्यात व्यस्त-

आधीच्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच पहिला ठराव केला तो युती सरकारने केलेला चारजणांचा एक प्रभाग हा कायदा बदलून तीनजणांचा एक प्रभाग केला. अडीच वर्षांत सरकार बदलले. याही सरकारने पहिला ठराव केला तो तीन जणांचा प्रभाग बदलून तो पूर्वीप्रमाणेच चारजणांचा एक प्रभाग असा केला. त्याला न्यायालयात आव्हान दिले गेले. आता हे प्रकरण तिथेच अडकून राहिले आहे. निकाल अजून लागलेला नाही. त्यामुळे निवडणूकही जाहीर व्हायला तयार नाही.

पुण्यात शिंदे गट मजबूत होणार?

राज्यातील सत्ताबदलाला जिल्ह्यात आधी मुळीच प्रतिसाद मिळालेला नव्हता. नंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, पुरंदर विधानसभेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेतील फुटीला साथ दिली. त्यांना पुण्यातून माजी नगरसेवक नाना भानगिरे, किरण साळी, अजय भोसले यांची जोड मिळाली. हा शिंदे गट आता राजकीयदृष्ट्या मजबूत होण्याच्या तयारीला लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत?

बहुसंख्य सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने त्यांना राजकीय वर्चस्व कायम ठेवणे नेहमीच सोपे राहिले. मात्र, जिल्ह्याचे नाक असलेल्या पुणे शहरात त्यांचे काहीही चालत नाही. भारतीय जनता पक्ष त्यांची नाकेबंदी करून उभा आहे. संघटनेच्या स्तरावर भाजपने पुण्यात जे काही करून ठेवले आहे, ते वाखाणण्यासारखे आहे. राष्ट्रवादीचे बलशाली लोकही त्यांचे काही करू शकलेले नाहीत. जिथे एकेकाळी एकहाती वर्चस्व असलेल्या आणि आता गलितगात्र झालेल्या काँग्रेसची गोष्टच वेगळी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी पुण्यातच नाही, तर जिल्ह्यातही अजून चाचपडतच आहे. आरपीआयची कोणाच्या तरी हातात हात घालून चालण्याची फरफट सुरूच आहे.

...तरीही नाव घ्यावे असे काहीच नाही

भाजपकडे पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा आहेत. खासदारकी त्यांच्याकडेच, त्याशिवाय पुणे-पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांत त्यांचीच सत्ता होती. इतके मोठे राजकीय यश मिळवूनही नाव घ्यावे, लोकांना ज्याचा उपयोग होईल असे काहीही त्यांच्या नावावर यंदाच्या वर्षात लागले नाही. राज्यात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये हिरिरीने साथ देणे व कधीकधी तर टीका करणाऱ्यांच्या हातात स्वत:च कोलित देणे हाच प्रकार वर्षभर भाजपकडून सुरू होता.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे