शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सिंहावलोकन २०२२ | राजकारणानेच बिघडवले राजकारण अन् प्रशासनही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत?...

- राजू इनामदार

पुणे : राजकारणच राजकारणाचा खेळ कसा खराब करून टाकते याचे उत्तम उदाहरण यंदाच्या वर्षात जिल्ह्यात पाहायला मिळाले. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊन गेला, अद्याप जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासकराज सुरू आहे. विशेष म्हणजे निवडणुकीबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

आधी आरक्षणाने आणि नंतर प्रभाग कितीचा? या राजकारणावरून हा सगळा खेळ झाला. मुदत संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊन तिथे लोकनियुक्त सदस्यांचे काम सुरू व्हायलाच हवे हा झाला कायदा. तो अस्तित्वात आहे. मात्र, एकूणच सगळे प्रकरण राजकारणात अडकले आणि कायद्याच्याच साहाय्याने शह-काटशह असा प्रकार सुरू झाला. सगळा कारभार प्रशासकांच्या ताब्यात आहे आणि ते त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेत आहेत. त्यांना अडवायला किंवा जाब विचारायला लोकप्रतिनिधीच नाही अशी स्थिती आहे.

प्रकरण न्यायालयात गेले व तिथेच अडकून राहिले-

ओबीसी आरक्षण कसे द्यायचे या प्रश्नावरून हा विषय सुरू झाला. कोरोनामुळे सन २०२१ ची जनगणना झालीच नाही. त्याही आधी ओबीसींची नक्की संख्या किती याबद्दल वाद होतेच. जनगणनाच झाली नसल्याने हा वाद अधिक वाढला. प्रकरण न्यायालयात गेले व तिथेच अडकून राहिले. कसेबसे ते सुटले तर राज्यात सत्ताबदल झाला.

राजकारणी प्रभाग रचना बदलण्यात व्यस्त-

आधीच्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच पहिला ठराव केला तो युती सरकारने केलेला चारजणांचा एक प्रभाग हा कायदा बदलून तीनजणांचा एक प्रभाग केला. अडीच वर्षांत सरकार बदलले. याही सरकारने पहिला ठराव केला तो तीन जणांचा प्रभाग बदलून तो पूर्वीप्रमाणेच चारजणांचा एक प्रभाग असा केला. त्याला न्यायालयात आव्हान दिले गेले. आता हे प्रकरण तिथेच अडकून राहिले आहे. निकाल अजून लागलेला नाही. त्यामुळे निवडणूकही जाहीर व्हायला तयार नाही.

पुण्यात शिंदे गट मजबूत होणार?

राज्यातील सत्ताबदलाला जिल्ह्यात आधी मुळीच प्रतिसाद मिळालेला नव्हता. नंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, पुरंदर विधानसभेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेतील फुटीला साथ दिली. त्यांना पुण्यातून माजी नगरसेवक नाना भानगिरे, किरण साळी, अजय भोसले यांची जोड मिळाली. हा शिंदे गट आता राजकीयदृष्ट्या मजबूत होण्याच्या तयारीला लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत?

बहुसंख्य सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने त्यांना राजकीय वर्चस्व कायम ठेवणे नेहमीच सोपे राहिले. मात्र, जिल्ह्याचे नाक असलेल्या पुणे शहरात त्यांचे काहीही चालत नाही. भारतीय जनता पक्ष त्यांची नाकेबंदी करून उभा आहे. संघटनेच्या स्तरावर भाजपने पुण्यात जे काही करून ठेवले आहे, ते वाखाणण्यासारखे आहे. राष्ट्रवादीचे बलशाली लोकही त्यांचे काही करू शकलेले नाहीत. जिथे एकेकाळी एकहाती वर्चस्व असलेल्या आणि आता गलितगात्र झालेल्या काँग्रेसची गोष्टच वेगळी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी पुण्यातच नाही, तर जिल्ह्यातही अजून चाचपडतच आहे. आरपीआयची कोणाच्या तरी हातात हात घालून चालण्याची फरफट सुरूच आहे.

...तरीही नाव घ्यावे असे काहीच नाही

भाजपकडे पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा आहेत. खासदारकी त्यांच्याकडेच, त्याशिवाय पुणे-पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांत त्यांचीच सत्ता होती. इतके मोठे राजकीय यश मिळवूनही नाव घ्यावे, लोकांना ज्याचा उपयोग होईल असे काहीही त्यांच्या नावावर यंदाच्या वर्षात लागले नाही. राज्यात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये हिरिरीने साथ देणे व कधीकधी तर टीका करणाऱ्यांच्या हातात स्वत:च कोलित देणे हाच प्रकार वर्षभर भाजपकडून सुरू होता.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे