शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकसंख्या नियंत्रणाचा राजकीय पक्षांना धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:00 IST

सन १९४७ मध्ये ३३ कोटी असलेली देशाची लोकसंख्या आजमितीस सव्वाशे कोटींच्या पुढे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात उल्लेख नाही जनतेनेच राजकीय पक्षांवर दबाव टाकावाकाही धर्मामध्ये कुुटुंब नियोजन हा विषय त्याज्य

- राजू इनामदार-  पुणे:  लोकसंख्येतील बेसुमार वाढ या विकासाचा वेग कमी करणाऱ्या समस्येकडे भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात पुर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे. खेड्यांमधून शहरांकडे होत असलेले स्थलांतरही दुर्लक्षित करण्यात आले आहे.    सन १९४७ मध्ये ३३ कोटी असलेली देशाची लोकसंख्या आजमितीस सव्वाशे कोटींच्या पुढे आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन खालोखाल भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकसंख्या ही विकासाच्या वेगाला बाधा आणणारी समस्या वाटल्याने चीनसह अनेक देशांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या आहेत. भारतातही काँग्रेसचे सरकार असताना संजय गांधी यांनी हा विषय ऐरणीवर आणला होता. राष्ट्रीय विषय म्हणून त्याला प्राधान्य दिले. मात्र,  त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याने देशभरात त्याविरोधात वादळ उठले. काँग्रेसला त्याची राजकीय किंमत मोजावी लागली. त्यामुळेच की काय पण १९८० नंतर एकाही राजकीय पक्षाने या विषयाला प्राधान्य दिलेले नाही. भारतात विविध जातीधर्माचे समूह राहतात. काही धर्मामध्ये कुुटुंब नियोजन हा विषय त्याज्य ठरवण्यात आला आहे. त्यांचा रोष नको म्हणूनही केंद्र किंवा राज्यातील कोणतेही सरकार या विषयासाठी काहीही करायला तयार नाही. मतपेढीला धक्का लागण्याचा धोका पत्करण्याची तयारी नसल्यानेच राजकीय पक्षाने या विषयाला स्थान दिलेले नाही, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा ५५ पानांचा तर भाजपाचा संकल्पनामाही जवळपास तेवढ्याच पृष्ठांचा आहे. त्यात आरोग्य, शिक्षण, तसेच विकासाशाी संबधित मुद्दे आहेत, मात्र या विकासाचा वेग कमी करणाºया लोकसंख्येसंदर्भात काही भाष्य नाही. दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या या औदासिन्याबाबत समाजातल्या जाणकारांमध्ये नाराजीची भावना आहे.राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये समावेश नसल्यामुळे कुटुंबनियोजन कार्यक्रमाला देशस्तरावर कधीही पाठिंबा मिळत नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये नावापुरते म्हणून काही उपक्रम राबवले जातात, मात्र त्याचा प्रचार, प्रचार, प्रबोधन करण्याची जबाबदारी सरकारने पुर्णत: टाळली असल्याचेच चित्र आहे. त्यासंदर्भात राष्ट्रीय पक्ष गंभीर नसल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यावरून स्पष्ट होत आहे.खेड्यांमधून शहरांकडे होत असलेले स्थलांतर हाही गेल्या काही वर्षात गंभीर झालेला विषय आहे. उलट शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नागरी सुविधांची संख्या व गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात ठळकपणे आहे. खेड्यांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा मुद्दा दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये नाही. ------------------जनतेनेच राजकीय पक्षांवर दबाव टाकावालोकसंख्या नियंत्रण हा आपल्याकडे धर्म, पारंपरिक समजूती, रुढी, परंपरा अशा अनेक समाजघटकांना धक्का देणारा विषय आजही आहे. त्यातच एकदा हा विषय घेतल्यामुळे राजकीय बदनामी कशी झाली याचे उदाहरण सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे. त्यामुळेच हा विषय टाळण्यात येत असतो. मतपेढी कमी होण्याचा धोकाही असतो. म्हणूनही काळजी घेण्यात येत असावी, मात्र हा मुद्दा, त्यावरची उपाययोजना याचा उल्लेख जाहीरनाम्यांमध्ये गंभीरपणे येणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे खेडी आता खेडी राहिलेलीच नाही असाही एक भाग आहे. पण यातही जगण्यासाठी स्थलांतर करावे लागणे, तशी स्थिती एखाद्या मोठ्या समुहासमोर निर्माण होणे यात सरकारचे अपयशच आहे. जनतेनेच राजकीय पक्षांना अशा महत्वाच्या विषयावर प्रकट व्हायला भाग पाडले पाहिजे.प्रा. प्रकाश मा. पवार, राजकीय अभ्यासक, विश्लेषक, पुणे 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक