शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: राजकीय उष्माघात? पक्षफोडीच्या चर्चेने तापले राजकारण; सगळेच एका माळेचे मणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:09 IST

महाराष्ट्रात सत्ता मिळवणे, सत्तेत राहणे, सत्ता टिकवणे यासाठी काहीही करणे म्हणजे राजकारण अशी नवी व्याख्या

राजू इनामदार

पुणे: एकीकडे भर दुपारी झालेल्या सभेला उपस्थिती लावलेले श्री सेवक उष्माघातात बळी गेले; तर दुसरीकडे अजित पवार भाजपसाेबत जाणार या चर्चेने राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी ‘सत्तेवर असणारे काय आणि सत्तेवर नसणारे काय? ही लोकं काहीही करतील. सगळेच एका माळेचे मणी!’ अशा शब्दांत आपला उद्वेग व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपात प्रवेश करणार, या चर्चेने राजकारण ढवळून निघत आहे. यामागे समाजमाध्यमांचा अगदी व्यवस्थित वापर करून घेणाऱ्यांचा मास्टरमाईंडच कार्यरत असल्याचा संशयही अनेकांनी व्यक्त केला. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्तेही या चर्चेने दिङमूढ झाले असल्याचे दिसते आहे.

अजित पवारांवर तरी विश्वास कसा ठेवायचा? 

खुद्द अजित पवार यांनीच असे काहीही नाही, असे सांगितल्यानंतरही लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. एका नागरिकाने सांगितले की, त्यांच्यावर तरी विश्वास कसा व का ठेवायचा. ते एकदा पहाटे गेले नव्हते का शपथ घ्यायला? त्यावेळी गेले होते तर आता जाणारच नाहीत हे कशावरून? दस्तुरखुद्द अजित पवारच घडामाेडी नाकारत असतानाही नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतही बरेच काही बोलले जात आहे. त्यांनीच हे सांगितले असेल, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. यावरून राजकीय वातावरण किती तापले असेल त्याची कल्पना येते.

काहींची संहिताही लिहून तयार 

बहुतेकांनी या पक्षप्रवेशाची संहिता देखील स्वत:च तयार केली आहे. ती बरोबर शिवसेना फुटली गेली त्यावर आधारित आहे. अजित पवार कितीजण घेऊन बाहेर पडतील हेही त्यात निश्चित आहे. कधी पडतील तेही सांगितले जात आहे. सत्ता स्पर्धेचा निकाल लागला की लगेचच हा प्रवेश होणार, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आणखी १६ जण अपात्र ठरणार, अशा अनेक वावड्या सध्या उडवल्या जात आहेत. अजित पवार तिकडे जातील ते मुख्यमंत्री होण्यासाठीच, अशी खात्रीही अनेकजण बोलून दाखवतात.

सामान्यांना आला उबग 

दुकानदार, व्यापारी, रस्त्यावरचे विक्रेते अशा अनेकांनी या अशा राजकारणाचा उद्वेग, जाऊ द्या हो, त्यांचे काही सांगू नका आणि विचारूही नका अशा शब्दात व्यक्त केला. फोडाफोडी करणे म्हणजेच राजकारण, असे आता झाले आहे. भाजप यापुढे देशातच नाही तर जगातही याच एका वैशिष्ट्यासाठी ओळखला जाईल, असेही मत काहींनी व्यक्त केले. सत्ता मिळवणे, सत्तेत राहणे, सत्ता टिकवणे यासाठी काहीही करणे म्हणजे राजकारण अशी नवी व्याख्या आता रुढ झाली आहे. त्याला सध्याचे फोडाफोडीचे राजकारणच कारणीभूत आहे, अशी टीका केली जात आहे.

राजकीय गोटातही गडबड 

- राजकीय पक्षाचे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्तेही या चर्चेने स्तंभित झाले आहेत. राष्ट्रवादीच्याच एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, राजकारणाचे असे भरीत होण्याचे कारण भाजपच आहे. शिवसेना फोडण्यामागे तेच होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी करण्यामागेही त्यांचाच हात आहे. प्रादेशिक पक्ष टिकू द्यायचेच नाहीत, असे त्यांचे धोरण आहे व त्याला अनुसरूनच त्यांचे काम सुरू आहे.- काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा सन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच भाजपने केली. याकडे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले. प्रादेशिक पक्ष संपले की देशात तळागाळापर्यंत पोहोचलेला काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. त्यांच्या नेत्यावर सतत आघात करत राहिले की आपोआपच त्यांची शक्ती कमी होईल. नंतर देशात राजकीय पक्षच राहणार नाहीत, अशा उद्देशाने भाजप काम करत असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.- भाजपच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला असता त्यांनी भाजपचा कधीही अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि नाही असे सांगितले. राजकीय संस्कृतीच बदलत चालली आहे. कोणाला सत्तेबरोबर यावेसे वाटले तर लोकशाही राज्यव्यवस्थेत त्यांना नकार कशासाठी व का द्यायचा असा प्रश्न त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण