शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

'पोलीस भरती लवकर करावी', उमेदवारांच्या आंदोलनाचा निर्णय मंगळवारी, फडणवीस यांच्यासोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 12:39 IST

केवळ सरकारने चुकीची वय गणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले, आम्हाला एक संधी द्यावी, आंदोलकांची मागणी

पुणे : पोलीस भरती लवकर करावी, वय निघून गेलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी द्यावी याची मागणी करत उमेदवारांनी शनिवारी बंडगार्डन पाेलिस ठाण्याच्या समाेरील चाैकात दुपारी ठिय्या दिला. त्यांना युवक काँग्रेसची साथ मिळाली तसेच आमदार रवींद्र धंगेकर यांनीही भेट दिली. तर सायंकाळी गिरीश महाजन यांनी उमेदवारांना भेट देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत बाेलणे करून दिले. त्यामुळे, आंदाेलक उमेदवार येत्या मंगळवारी फडणवीस यांना भेटून त्यावर चर्चा करणार आहेत.

कोरोना काळानंतर गेल्या दोन वर्षांपासून सरकारनेपोलिस भरती केली नाही. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुण-तरुणींना एक संधी द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले. परंतु पाेलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांनी चाैकाच्या मधाेमध ठिय्या दिला. सरकारने दिलेले आश्वासन पाळले पाहिजे, संधी मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, न्याय द्या, न्याय द्या फडणवीस साहेब न्याय द्या, या घोषणांनी पोलिस भरती तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला हाेता.

केवळ सरकारने चुकीची वय गणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला एक संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलनाद्वारे करत आहेत. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक, प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक सरचिटणीस सुजित गोसावी उपस्थित होते.

सध्या सुरू असलेली पोलिस भरती ही २०२२ मधील आहे. परंतु राज्य सरकारने मुलांचे वय गणना करताना २०२४ वर्ष पकडले आहे. त्याचा फाटका आम्हाला बसत आहे. पोलिस भरतीसाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सराव सुरू आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आम्हाला पोलिस भरतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सरकार निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया उमेदवार सागर माळी यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजनravindra dhangekarरविंद्र धंगेकरHealthआरोग्य