शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर : प्रशांत ढोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:13 IST

अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभाग कार्यान्वित

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) लगत असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडत गावामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी व येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे.तसेच स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी वरिष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करू, असे सांगत सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले.

१ जानेवारी अभिवादन कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, सरपंच संदीप ढेरंगे, उपसरपंच सविता घावटे, शिवसेनेचे अनिल काशीद, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, नवनाथ माळी, माजी उपसरपंच गणेश कांबळे, सदस्य केशव फडतरे, माजी अध्यक्ष बबुशा ढेरंगे, माजी सदस्य उमेश गव्हाणे, कुंदा फडतरे, मीना ढेरंगे, विवेक ढेरंगे, राजेंद्र गवदे, अमीर इनामदार, राजेशसिंह ढेरंगे, सचितानंद कडलक, दीक्षांत भालेराव, प्रवीण खलसे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ, पोलिस पाटील मालन गव्हाणे, संदीप कारंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रशांत ढोले यांनी सांगितले की, अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले असून बसेसची संख्या व वाहनतळाची जागा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहे. भीमा नदीवरील पुलावर बांधकाम विभागाकडून संरक्षक जाळी २५ डिसेंबर पूर्वी बसवल्या जातील, असे सांगत सोशल मीडियावर चुकीचे मेसेज न टाकण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले की, मागील वर्षी अपुऱ्या बॅरिकेटिंगमुळे चेंगराचेंगरी झाली होती. त्यातून मार्ग काढत यावर्षी वाहनतळ व बॅरिकेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तर २०१८ च्या दंगलीचा आपल्या गावावर पडलेला डाग नक्कीच पुसून टाकायचा आहे, यासाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळावे, असे आवाहन केले.

नाव कोरेगावचे अन् निधी पेरणेला?

१ जानेवारी पासून कोरेगाव भीमा गावची सामाजिक हानीबरोबरच आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली असूनही गावच्या सर्व समाजाच्या वतीने सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न चालूच राहणार आहे मात्र प्रशासनाने गावासाठी भीमा नदीवर संरक्षक घाट, रस्ते, विद्युत दिवे व इतर भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी गेल्या सहा वर्षात एक रुपयाही निधी दिला नाही तर या उलट पेरणे ग्रामपंचायतीला मोठा निधी देत आहात, हा कोणता न्याय आहे, असा सवाल उपस्थित करून स्थानिक तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSocial Mediaसोशल मीडिया