शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वा क्या बात है! अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिले शिवरायांवर काव्यचरित्र; तब्बल ६५० पानांचा ग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:49 IST

वयाच्या १६ व्या वर्षी चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ या नावाने हे संपूर्ण महाकाव्य अवघ्या ५० दिवसात लिहून पूर्ण केले

नम्रता फडणीस 

पुणे : ‘महाकाव्य शिवप्रताप’ हे मराठी भाषेतील १९ वृत्तांतले पहिले वृत्तबद्ध महाकाव्य शिवप्रेमी मंडळींना वाचायला मिळणार आहे. वयाच्या १६ व्या वर्षी चिन्मय मोघे याने ‘कवी समर’ या नावाने हे संपूर्ण महाकाव्य अवघ्या ५० दिवसात लिहून पूर्ण केले. या ग्रंथाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना असून, कै. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा ग्रंथात समावेश आहे.

चिन्मय मोघे याने चार वर्षांपूर्वी ग्रंथ लिहून पूर्ण केला; परंतु कोरोनामुळे पुस्तकाचे प्रकाशन रखडले. आता त्याचे वय २० वर्ष आहे. पुरंदरे प्रकाशनाने हा ६५० पानी ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. या मराठीतील पहिल्या वृत्तबद्ध महाकाव्याविषयी ‘लोकमत’शी बोलताना चिन्मय मोघे म्हणाला, शिवाजी महाराजांवर महाकाव्य लिहिण्याची खूप इच्छा होती; पण ते लिहिण्यापूर्वी मी काही एक-दोन पोवाडे रचले आणि महाकाव्याचे ३००० श्लोकलिहून पूर्ण केले. त्यापूर्वी महाकाव्य कसं असतं, हे बघण्यासाठी मी रामायण आणि महाभारत वाचले. ही दोन्ही महाकाव्य छंदबद्ध स्वरूपात आहेत.

मला महाकाव्य हे पूर्णत: वृत्तात करायचे होते. छंदात अक्षर ठरलेली असतात; पण शंभर श्लोक जर एका वृत्तात लिहित असू तर त्याचे तिसरे अक्षर हे ऱ्हस्वच असायला हवे. हा काव्याच्या गणिती भाषेचा नियम आहे. शंभर वर्षांपूर्वी सावरकरांनी वृत्तबद्ध पोवाडे रचले होते. ती परंपरा काहीशी खंडित झाली होती. ती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. या महाकाव्यासाठी स्वत: अभंगज्योती या वृत्ताची रचना केली. भुजंगप्रयात, राजहंस, चंद्रकांत आदी वृत्त प्रामुख्याने वापरली आहेत. हे वृत्तबद्ध गेय, लयबद्ध आणि प्रमाणबद्ध असे काव्य आहे.

लवकरच दोन कादंबऱ्या येणार

छत्रपती शिवाजी महाराजांवर महाकाव्य लिहिण्यामागचे हे कारण देखील आहे की महाकाव्याला असाच नायक अभिप्रेत आहे. ज्याचे दिव्य चरित्र आहे. त्यामुळे महाकाव्यासाठी शिवाजी महाराजांचेच नाव डोळ्यासमोर आले. याकरिता महाराजांची पत्रे वाचली. त्यांच्या समकालीन कवींनी त्यांच्यावर केलेल्या संस्कृत रचना वाचल्या. हे महाकाव्य अगदी सामान्य व्यक्तींनादेखील वाचता येऊ शकेल, सर्वांना पाठ करता येईल अशाच पद्धतीनेच लिहिले आहे. लवकरच माझ्या 'तथागत बुद्ध' आणि 'उर्मिला' या कादंबऱ्या प्रकाशित होणार असल्याचे चिन्मयने सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेSocialसामाजिक