शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

'घर असावे घरासारखे'कवितेच्या कवयित्री विमल लिमये यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:49 PM

'घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती' ही गाजलेली कविता लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री विमल लिमये (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.

पुणे :'घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती' ही गाजलेली कविता लिहिणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री विमल लिमये (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.

       हिंदी विषयाच्या शिक्षिका असलेल्या लिमये यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३० ला सातारा येथे झाला. मराठी, हिंदी साहित्याच्या अभ्यासक असल्याने विपुल वाचनासोबतच त्यांनी काव्यलेखन व लहान मुलांसाठी दर्जेदार लेखन केले. त्यांच्या 'घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती' या अजरामर कवितेमुळे जगभरातील मराठी रसिकांच्या मनात त्यांचे नाव कोरले गेले. ख्यातनाम संगीतकार श्रीधर फडके यांनी या कवितेला चाल लावली होती. अनेक ठिकाणी ही कविता पोस्टर करुन  लावलेली आढळते. विमल लिमये यांचा स्वभाव प्रसिद्धीपराड्मुख असल्यानेअनेकांना ही कविता त्यांची आहे हेही माहीत नव्हते. झरोका, अंत:स्वर, प्रसाद तर लहान मुलांसाठी लिहिलेला चन्या-मन्या हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय होते. 

     पुण्यातील विविध साहित्य संस्था, सामाजिक संस्था तसेच गानवर्धन या सांगीतिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विपुल अशी साहित्य, सामाजिक व संगीतसेवा केली. शुक्रवारी (६ जुलै) वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य व संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी त्यांच्या कन्या सुनीत लिमये, वासंती ब्रह्मे, जावई मकरंद ब्रह्मे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मृणालिनी चितळे, दीपक करंदीकर, जयंत भिडे, गोविंदराव बेडेकर, प्रसाद भडसावळे, रविंद्र दुर्वे, मधुसूदन घाणेकर, प्रदीप निफाडकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकDeathमृत्यू