पुणे - पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएमएल बस आणि मेट्रो सेवा मोफत करण्याची मोठी घोषणा केली. मात्र या घोषणांवर भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका करत अजित पवारांना टोला लगावला आहे.पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,“महापालिकेत सत्ता येणारच नसेल तर काहीही घोषणा करायला काय हरकत आहे? जाहीरनामे हे पूर्ण करण्यासाठी नसतात, तर फक्त हमी देण्यासाठी असतात.” अजित पवार पूर्वीही अनेक वेळा घोषणांबाबत गोंधळात टाकणारी वक्तव्ये करत आले असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “९९ रुपयांत वीज देण्याची घोषणा झाली, नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीएमएल आणि मेट्रो मोफत करण्याबाबतही दादांनी नेमकं काय म्हणायचं आहे, हे माध्यमांनी एकदा स्पष्टपणे विचारावं.”चंद्रकांत पाटील यांनी इतर राज्यांतील निवडणूक घोषणांचाही दाखला दिला. “निवडणूक जिंकण्याची शक्यता नसताना अशा प्रकारच्या लोकांना भुरळ घालणाऱ्या घोषणा केल्या जातात. बिहारमध्ये काँग्रेसने महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यामागेही तेच गणित होतं,” असे ते म्हणाले.अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावर बोलताना पाटील म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या हे चांगलं आहे, पण आता पक्षाचं नाव काय असणार, हेही पाहावं लागेल.” पुणे महापालिकेत सत्ता मिळणार नसताना अशा मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्याची टीका करत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
Web Summary : Chandrakant Patil criticized Ajit Pawar's free transport promise for Pune, questioning its feasibility given NCP's weak position in the Pune Municipal Corporation. He alleged such announcements are merely election ploys, citing past unfulfilled promises. Patil also commented on the merger of NCP factions, focusing on the party's future identity.
Web Summary : चंद्रकांत पाटिल ने अजित पवार के मुफ्त परिवहन वादे की आलोचना की, पुणे नगर निगम में एनसीपी की कमजोर स्थिति को देखते हुए इसकी व्यवहार्यता पर सवाल उठाया। उन्होंने आरोप लगाया कि ऐसी घोषणाएं केवल चुनावी हथकंडे हैं, और अतीत के अधूरे वादों का हवाला दिया। पाटिल ने एनसीपी गुटों के विलय पर भी टिप्पणी की।