शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पाण्याचा नियोजनबद्ध वापर हवा ; पाणी पुरवठ्यावरुन अनेकदा राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 21:16 IST

भविष्यात पाणी टंचाईचे संकट टाळायचे असेल तर पाण्याचा नियोजनबद्ध वापर करायला हवा..

ठळक मुद्देपरिसंवादात सूर : ‘पुण्याचे पाणी : सत्य आणि मिथक’ बाबत चर्चा

पुणे : शहरालगत असलेला धरणातील पाणीसाठा वाढत्या पुण्याला पाणी पुरवण्यासाठी अपुरा पडतो. परिणामी, पाणी पुरवठ्यावरुन अनेकदा राजकारण होते. पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. भविष्यात पाणी टंचाईचे संकट टाळायचे असेल तर, प्रशासनासह आपण सर्व पुणेकर नागरिकांनी पाण्याचा नियोजनबद्ध वापर करायला हवा, असा सूर 'पुण्याचे पाणी : सत्य आणि मिथक' या विषयावरील परिसंवादात उमटला.मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे स्थानिक केंद्र यांच्य संयुक्त विद्यमाने व इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन पुणेच्या सहभागाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. जंगली महाराज रस्त्यावरील दि इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनीअर्सच्या काळे सभागृहात झालेल्या या परिसंवादात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव विद्यानंद रानडे, वैज्ञानिक डॉ. व्ही. एम. प्रभाकर, डॉ. मंगेश कश्यप, डॉ. अशोक मोरे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.कुलकर्णी म्हणाले, शहराची वाढ झपाट्याने होत असून आजूबाजूची गावे शहरात समाविष्ट होत आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. १९९३ नंतर राज्यात कोणतेही नवीन धरण बांधण्यात आले नाही. परंतु, लोकसंख्या वाढ मात्र प्रचंड होत आहे. २०५१ मधील लोकसंख्येची गरज सध्याच्या लोकसंख्येच्या २.६ पट असेल. अर्थातच पाण्याची मागणी त्याच पटीने वाढेल व त्यासाठी आतापासून नियोजनाची गरज आहे. पाण्याचे मीटर व टेलीस्कोपिक दर लावणे अत्यंत गरजेचे आहे. प्रभागात मीटर बसवल्यावर पाण्याची गळती शोधून कमी करता आली. पाण्याचा योग्य वापर व फेर वापर करनेअत्यंत गरजेचे आहे. रानडे म्हणाले, पूर्वीच्या काळात शेतीसाठी पाणी आरक्षित ठेवले जात होते. परंतु, आता परिस्थिती उलट झाली असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी झगडावे लागते आहे. शहरांतील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा विचार केला पाहिजे. महापालिकेकडून पाण्याचे मोजमाप होणे गरजेचे आहे आणि पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.भुजबळ म्हणाले, पाण्याचा पुनर्वापर करण्याचा खर्च सद्यस्थितीत जास्त आहे. येणाºया काळात तंत्रज्ञान विकसित होईल. तेव्हा ती गोष्ट सोपी होईल. भूजल कायदा अधिक कडक करण्याची आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्याचा उपयोग पाण्याची पातळी वाढण्यासाठी होईल. पुण्यात राजकीय इच्छाशक्ती व लोकसहभागाने हे शक्य होऊ शकते.’कश्यप म्हणाले, पाणी वापराच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. यात महिलांचा सहभाग वाढवायला हवा. कुठल्याही राजकीय दबाव न येता पाण्याचे नियमन करणे गरजेचे आहे. डॉ. प्रभाकर म्हणाले, की नदीच्या पाण्याची गुणवत्ता मोजणे व ती लोकपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. सांडपाण्याचा उपयोग पाण्याप्रमाणे संसाधन म्हणून वापराण्यासाठी संशोधन गरजेचे आहे.डॉ. अशोक मोरे म्हणाले, कॉलेजमध्ये पाणी विषयावर अभ्यास व संशोधन केले जाते. ते अधिक व्हायाला हवा. समापन करताना राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, की पाणी प्रश्नांकडे एकात्मिक दृष्टीने बघायला हवे. शासनाइतकाच नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. पुण्या शहराची लोकसंख्या उपलब्ध पाण्यानुसार ठरवायला हवी. वसंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर नंदू भोई यांनी आभार मानले. या प्रसंगी  डॉ. निलिमा राजुरकर, डॉ. सुजाता बरगाले, संजय मा. क.  विलास रबडे, के. एन. पाटे. डॉ. दिनकर मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका