शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:10 IST

वाल्हे. वाल्हे.- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, ...

वाल्हे.

वाल्हे.- पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामधून काही वेळा अपघात घडले आहेत. दरम्यान या पालखी महामार्गाची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग पुणे यांनी फुरसुंगी पासून, दिवे घाट , सासवड, जेजुरी येथील खड्डे बुजवले. मात्र, सर्वाधिक धोकादायक खड्डे दौंडज खिंड ते निरा येथील अरुंद रस्त्यावर आहेत. मात्र संबंधित प्रशासनाने, याच मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत. पिसुर्टी फाटा ते लोणंद या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, पिसुर्टी फाटा ते दौंडज खिंड या अरुंद रस्त्यावरील खड्डे मात्र संबंधित प्रशासनाने बुजवले नाहीत.

साखर कारखाने सुरू झाले असल्याने, याच महामार्गावरून, पुरंदर तालुक्यातील जवळपास सर्वच ऊस वाहनांना याच खड्डेमय मार्गावरुन प्रवास करावा लागत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर- ट्रॉली उलटून उपघात झाले आहेत.

पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग रूंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची चर्चा वाल्हे परिसरामध्ये आहे. माञ प्रत्यक्षात जेव्हा पालखी महामार्ग रूंदीकरणाचे काम संबंधित विभागाने कधीही सुरू करूद्यात, त्या आगोदर या महामार्गावरील खड्डे आगोदर बुजवून साईड पट्टीच पूर्ण भरून घ्यावी. अशी मागणी येथील ग्रामस्थ, प्रवाशी करत आहेत.

मागील काही वर्षांत शासनाने दिवे घाट ते जेजुरी औद्योगिक वसाहत या पालखी महामार्गावरील चौपदरीकरण सुरू केले होते; मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नाही. तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या पुढील रस्ता जेजुरी खिंड ते नीरा या रस्ताचे रुंदीकरण अद्यापपर्यंत केले गेले नाही. काही ठिकाणी तर दोन गाड्या रस्त्यावरही बसत नसल्याने या रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. या महामार्गावरून सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगलोर आदी अनेक मोठ्या रस्त्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने अनेक अवजड वाहने या मार्गावरुन ये जा करत असतात. तसेच या मार्गाने अनेक तीर्थक्षेञांना जाता येते. यामध्ये, जेजुरी, मोरगाव, आळंदी, देहू, पंढरपूर, शिखर शिंगणापूर आदी मोठ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. तसेच जेजुरी, नीरा, लोणंद या ठिकाणावरील औद्योगिक वसाहतीमध्ये दररोज अनेक महिला तसेच पुरुष कामगार याच रस्त्याने जात असतात. या महामार्गावरील सध्याची वाहतूक परिस्थिती पाहिली तर या मार्गावरील पडलेले खड्डे तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली साईडपट्टी भरून घेणे आवश्यक आहे.

काही दिवसा पासून या महामार्गा वरिल खड्डे बूजावण्याचे काम चालू आहे.मात्र ठेकेदाराने काही कारनस्थव ते काम मध्येच थांबवले आहे.पण राहिलेले काम लवकरात लवकर चालू करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

श्रुती नाईक.सहायक अभियंता श्रेणी 1 रास्ट्रीय महामार्ग विभाग पुणे .