शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

Uday Samant: कायमस्वरूपी ऑनलाईन परीक्षा हा तर गैरसमज; आता ऑफलाईन घेण्याची सरकारची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 18:36 IST

कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूपी आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे

पुणे : राज्य शासनाने कधीही ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण द्यावेत अशी भूमिका घेतली नाही. कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडेच आले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे कायम स्वरूपी आपण ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असा गैरसमज कोणी करून घेतला असेल तर तो साफ चूकीचा आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 119 पदवी प्रदान समारंभानंतर सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घ्याव्यात, असा मार्ग सुचवण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख्य म्हणून एकूण परिस्थितीचा विचार करून परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयात धरसोड झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ नये, याचीही विद्यापीठांनी काळजी घ्यायला हवी.       आरोग्य विभाग व म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांकडून सर्व परीक्षा पारदर्शकतेने घेतल्या जाव्यात, अशी मागणी केली जात आहे. केवळ विद्यार्थ्यांचीच नाही तर राज्य शासनाची सुध्दा तशीच भूमिका असून त्या-त्या विभागाचे मंत्री परीक्षा सक्षम घेण्याबाबत आवश्यक उपाययोजना करत आहेत, असेही सामंत यांनी नमूद केले.

वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर ...

राज्यात विद्यापीठे व महाविद्यालये सुरू झाली आहेत. परंतु, अद्याप वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही वस्तीगृहात राहण्यास परवानगी मिळत नाही, हे खरे असले तरी सध्या ‘ओमायक्रॉन’ मुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर क्वारंटाईन सेंटर साठी वसतीगृह उपलब्ध होण्यास अडचणी येतील. त्यामुळे विचारपूर्वक वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे सामंत म्हणाले.

लेखी तक्रारीनंतरच संबंधित महाविद्यालयांवर कारवाई

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी किती व कोणत्या गोष्टींसाठी शुल्क आकारावे, अशा स्पष्ट उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही काही महाविद्यालयांकडून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे शुल्क आकारून विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असेल तर संबंधित विद्यार्थी व पालकांनी त्याची लेखी तक्रार तंत्र शिक्षण सहसंचालक किंवा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे करावी. त्यानुसार चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल,असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयMahavikas Aghadiमहाविकास आघाडी