शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

उजणी पाणी प्रश्नासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 18:46 IST

उजणी तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू

ठळक मुद्देशासनाने इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढून शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीचा आदेश शासनाने रद्द केला आहे. याप्रकरणी पुनर्विचार होऊन शासनाने रद्द केलेला आदेश पूर्ववत करून इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न तात्काळ निकालात काढण्यात यावा. अशा काही मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिंम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी उजणी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य झाल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाच टीएमसी पाणी रद्द आदेशाचा पुनर्विचार व्हावा. आणि उजणीतून मराठवाड्याला २१ टीएमसी देण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे.  नदी, कॅनाल याद्वारे सोलापूरसाठी बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यात धरण ग्रस्तांच्या गावगुंडानी बळकावलेल्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्यात. अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू होते.

यावेळी  बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी जाहीर पांठीबा देत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले. यावेळी संजय सोनवणे म्हणाले की, शासनाने पाणी वाटपाबाबत इंदापूर तालुक्यावर अन्याय केला असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परीस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यातील २२ गावच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढून शेतकर्‍यांना न्याय द्यावा. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरSolapurसोलापूरDamधरणGovernmentसरकार