शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जातीये; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:12 IST

देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न

पुणे : सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

‘भारतमुक्ती मोर्चा’च्या वतीने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत होते. मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिभा उबाळे, सचिन बनसोडे, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, बहुजन समाजाला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर इत्यादी अनेकांनी हे वैचारिक आंदोलन पुढे सुरू ठेवले. आपण आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे. पुरोगामी विचारांसाठी आमच्या सगळ्यांची साथ अखंड राहील.

वामन मेश्राम म्हणाले, सत्यशोधक समाजातून उभ्या राहिलेल्या आंदोलनातून संविधानाला सामाजिक आशय लाभला आहे. ही विचारधारा संविधानाने मान्य केली. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले. समता, बंधुता या तत्त्वांवर समाजाची पुनर्बांधणी आवश्यक आहे. देशात संसदीय लोकशाही आली आहे. पण ती खरी लोकशाही नाही. देशात सर्वसमावेशक लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत समता मूल्य प्रस्थापित होणार नाहीत. त्यासाठी सत्यशोधक आंदोलन पुन्हा नव्या जोमाने उभारावे लागेल.

बाबा आढाव म्हणाले, नव्या संसदेत खासदारांना राज्यघटनेची प्रत दिली. त्यात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द नाही. ही घोर लबाडी असून, त्यावरून दिशा ओळखा. पक्षामध्ये मतभेद आहेत; पण देश म्हणून एकत्र या.’

लक्ष्मण माने म्हणाले, सत्यशोधक समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे. त्यासाठी पुन्हा आंदोलन उभे करण्यात येईल. शरद पवार आणि वामन मेश्राम यांनी एकत्र येऊन राज्य व देशासाठी काहीतरी केले पाहिजे. पुन्हा वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ द्यायचे नाही. ब्राह्मणेत्तर एकही मत भाजपकडे जाता कामा नये.

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणIndiaभारतSocialसामाजिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस