शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:27 IST

आपला इतिहास समजून घेत, भविष्याच्या दिशेने याेग्य मार्गक्रमण करणे हाच खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखे आहे

उद्धव धुमाळे

पुणे : देश स्वतंत्र होणार आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकणार.. हे निश्चित झाले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच अर्थात गुरुवारी, दि. १४ ऑगस्ट राेजी देशभर जल्लोषाची तयारी केली गेली. सार्वजनिक ठिकाणे विद्युत रोषणाईने सजविली गेली. रेल्वेदेखील त्याला अपवाद नव्हती. घराेघरी सडा-सारवाणी, रांगाेळी आणि गोडधोडाची तयारी झालेली हाेती. माझा मोठा भाऊ श्रीकृष्ण राजूरकर नेमका त्या रात्री रेल्वेने हैदराबादकडे येत होता. ताे सकाळी सकाळी घरी पाेहाेचला आणि स्वातंत्र्याच्या जल्लाेषाचं वर्णन करू लागला. रेल्वे सजवलेली होती... सर्व डब्यांमध्ये एकच चर्चा ती म्हणजे आपल्याला आता स्वातंत्र्य मिळणार... ही चर्चा सुरूच हाेती, रात्रीचे १२ वाजले आणि रेल्वेचा भोंगा जोरात वाजला. एक प्रकारे स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणाच झाली आणि प्रवाशांनी एकच जल्लोष केला... श्रीकृष्ण राजूरकर यांचे बंधू ९६ वर्षीय डॉ. नरसिंह राजूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना हा किस्सा सांगितला.

डॉ. राजूरकर हे उस्मानिया विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक. पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे साक्षीदार. पण, निजामशाहीत असल्याने देशाला स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्य वाट्याला आलेले. ना उघडपणे जल्लाेष करता येत, ना अभिमानाने तिरंगा हातात घेऊन फिरता येत. घरी मात्र स्वातंत्र्याचीच चर्चा सुरू हाेती. स्वातंत्र्याचा जल्लोष अनुभवता आला नाही, याचं दु:ख आजही मनात आहे; पण स्वातंत्र्याचा जल्लोष शब्दातून अनुभवता आला. देश स्वतंत्र झाला असला तरी आम्ही निजामी राजवटीत होतो आणि निजामाचा सरदार काशिम रजवी याने संस्थानात थैमान घातले होते. त्याच्या प्रक्षाेभक भाषणाने लाेक त्रस्त हाेते. खुलेआम कत्तली घडत हाेत्या. स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवण्यास मज्जाव करण्यात आला होता. सर्वत्र निजामाचे पिवळे झेंडेच फडकत हाेते. मी अगदी तरुण मुलगा. भावाकडून रेल्वेतील वर्णन ऐकल्यानंतर आसपास कुठे तिरंगा पाहता येईल का, आपल्यालाही तिरंगा फडकवता येईल का, या प्रेरणेने आणि उत्सुकतेने मी त्या दिवशी संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि निराश हाेऊन घरी परतलाे. कारण, कुठेच स्वातंत्र्याची झलक अनुभवायला आली नाही.

डाॅ. राजूरकर सांगत हाेते, माझा जन्म २४ ऑगस्ट १९२९ राेजी झालेला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा दिवसांनी १८ वर्षाचा झालेलाे. माझे वडील निजाम काॅलेजमध्ये कार्यालयीन अधीक्षक हाेते. माझं संपूर्ण शिक्षण हैदराबाद येथेच झालं आणि पुढे राज्यशास्राचा प्राध्यापक म्हणून उस्मानिया युनिव्हर्सिटीत रुजू झालाे. आमचं मूळ गावं लातूर जिल्ह्यातील राजूर. नाेकरी-शिक्षण सर्व हैदराबादला झालं. ‘पीएच.डी’ संशाेधनानिमित्त मला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्याचा याेग आला. दाेन वेळा दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात आणि एक वेळा घरी भेट झाली. सविस्तर चर्चा केली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी सविस्तर दिलं. त्यांच्या साेबत फाेटाेही काढता आला. तेव्हाचे राजकारणी त्यागी, तेजस्वी आणि देशाप्रति समर्पित हाेते. आज आपण समाज म्हणून आदर्श हरवून बसलाे आहाेत. सत्याची सचाेटी, प्रामाणिकता गमावून बसलाे आहाेत. देशाच्या प्रगतीचा पाया पंडित नेहरूंनी घातला. स्वतंत्र भारताच्या विकासाचा राेड मॅप त्यांनी देशाला दिला. पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम उभी राहते, त्याचा प्रत्यय आजही येत आहे. आजवर देशाने केलेली प्रगती, जगात निर्माण केलेले स्थान हे त्याचेच प्रतीक आहे. आपला इतिहास समजून घेत, भविष्याच्या दिशेने याेग्य मार्गक्रमण करणे हाच खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखे आहे.

टॅग्स :PuneपुणेIndependence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूprime ministerपंतप्रधानSocialसामाजिक