शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मैत्रीपूर्ण संबंधासाठी पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे : लष्कर प्रमुख बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 6:17 PM

मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ दीक्षांत संचलन सोहळा  प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पदे देण्यासाठी प्रयत्नशील 

पुणे : पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल  पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे. या पुढे जर पाकिस्तानला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्यांनी एक पाऊल पुढे येणे गरजेचे असून यासोबतच स्वत:ला ‘इस्लामिक' राष्ट्र न म्हणवता, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करावी, असा उपरोधिक टोला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला लगावला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १३५ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रावत बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाप्रसंगी भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित व्हावे अशी इच्छा असल्याचे व्यक्त केले. या साठी भारताने पहिले पाऊल टाकावे अशी अपेक्षा व्यक्त करत असे झाल्यास आम्ही दोन पावले टाकू असे विधान केले होते. या बाबत त्यांना प्रश्न विचारला असता रावत म्हणाले, आतापर्यंत भारताने पाकिस्तान सोबत कायम सौदाहार्याची भावना ठेवली आहे. दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी एक पाऊन पुढे येऊन भारताने पुढाकार घेतला आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.  मात्र, पाकिस्तान स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणवते. अधिका-यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी प्रबोधिनीत हे नवे तंत्र तसेच शस्त्रास्त्रे आणली जात आहे. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, असेही रावत म्हणाले. .......................सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपीपदे देण्यासाठी प्रयत्नशील सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पणे देता येईल का याचा विचा सुरू आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. प्रत्यक्ष  युद्धभीमीवर महिलांना नियुक्त करणे सद्यस्थितीत शक्य नाही. मात्र, मानसशास्त्र, भाषा अनुवादक, लेखापाल, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत महिला चांगले काम करू शकतात. या साठी महिला अधिका-यांचा विचार होत आहे. लवकरच याबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.  सैन्य दलातील बरेचसे जवान हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणे महिलांसोबत काम करण्याची मानसिकता अजून त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांची नियुक्ती नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले. ...................... 

टॅग्स :PuneपुणेBipin Rawatबिपीन रावतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान