शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पुरंदरच्या डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

नीरा: पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता तेल्या, मर आणि मुळकूज अशा आजाराने जेरीस आणले आहे. या ...

नीरा: पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता तेल्या, मर आणि मुळकूज अशा आजाराने जेरीस आणले आहे. या भागातील सुमारे ९०० एकर शेतीवरील डाळिंब बागा काढण्याची वेळ बागायतदारांवर आली असून, मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पुरंदर तालुक्यातील दक्षिण - पूर्व भागातील राख, कर्नलवाडी, गुळुंचे, नावळी तसेच वाल्हे गावच्या पूर्वेकडील वाड्या हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. १९९६ सालापासून या भागातील शेतकऱ्यांनी या दुष्काळी भागात डाळिंब शेतीचे प्रयोग सुरू केले. अत्यंत कमी पाण्यात येणार पीक म्हणून हे पीक या भागात चांगलच रुजलं. डाळिंबाचा उत्तम उत्पादन घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी आपली कष्टाची चुणूक दाखवून दिली. डाळिंबापासून मिळणारं चांगलं आर्थिक उत्पन्न पाहून अनेक सुशिक्षित तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा डाळिंब शेती करणे पसंद केले. या तरुणांनी आधुनिक पद्धतीने शेती करीत पुरंदरमधील डाळिंब सातासमुद्रापार युरोप खंडात जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांत पोचवले. विषरहित शेतीचे प्रयोग करून येथील शेतकऱ्यांनी विदेशी मार्केट काबीज केले. मात्र, आता या शेतकऱ्याला पुन्हा निसर्गाच्या पुढे हात टेकायची वेळ आली आहे. या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता राहत आहे. यामुळे डाळिंबाच्या मुळ्या कुजत आहेत. त्याचबरोबर तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मूळ कुजल्याने कमजोर झालेले झाड तेल्यामुळे उन्मळून पडत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब बाग काढण्यास सुरुवात केली आहे.

राख आणि परिसरात गेल्या तीन वर्षांत वेळेवर व जास्तीचा पाऊस पडत आहे. हाच पाऊस आमच्या डाळिंब शेतीसाठी घातक ठरतो आहे. दुष्काळात टँकरने पाणी घालून सुद्धा आम्हाला चांगले उत्पन्न मिळाले होते. पण, आता या परिसरातील ९०० एकर क्षेत्रातील डाळिंब काढावे लागले आहे. कीटकनाशक आणि इतर औषधांच्या खर्चाने मेटाकुटीला आला आहे. या औषधांच्या छापील किमती आणि प्रत्यक्ष विक्रीतील किमतीत मोठा फरक आढळून येतो. कंपन्या जास्त किमती छापत आहेत. यामध्ये कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना औषधावर अनाठायी खर्च करावा लागत असल्याचे राख येथील शेतकरी शांताराम पवार यांनी सांगितले.

माझ्याकडे १७ एकर डाळिंब होते. पण मुळकूज आणि तेल्या रोगामुळे संपूर्ण बाग काढून टाकावी लागली आहे. यातील तीन एकर बाग आताच काढून टाकली आहे. ही बाग वाचवण्यासाठी चार लाख खर्च केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने ती बाग काढून टाकली. आता आमच्या पुढे बेकारीच मोठं संकट उभ राहिले आहे.

महेंद्र माने, शेतकरी

२५ नीरा

डाळिंबाच्या बागेवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.