शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरच्या डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

नीरा: पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता तेल्या, मर आणि मुळकूज अशा आजाराने जेरीस आणले आहे. या ...

नीरा: पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता तेल्या, मर आणि मुळकूज अशा आजाराने जेरीस आणले आहे. या भागातील सुमारे ९०० एकर शेतीवरील डाळिंब बागा काढण्याची वेळ बागायतदारांवर आली असून, मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पुरंदर तालुक्यातील दक्षिण - पूर्व भागातील राख, कर्नलवाडी, गुळुंचे, नावळी तसेच वाल्हे गावच्या पूर्वेकडील वाड्या हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. १९९६ सालापासून या भागातील शेतकऱ्यांनी या दुष्काळी भागात डाळिंब शेतीचे प्रयोग सुरू केले. अत्यंत कमी पाण्यात येणार पीक म्हणून हे पीक या भागात चांगलच रुजलं. डाळिंबाचा उत्तम उत्पादन घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी आपली कष्टाची चुणूक दाखवून दिली. डाळिंबापासून मिळणारं चांगलं आर्थिक उत्पन्न पाहून अनेक सुशिक्षित तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा डाळिंब शेती करणे पसंद केले. या तरुणांनी आधुनिक पद्धतीने शेती करीत पुरंदरमधील डाळिंब सातासमुद्रापार युरोप खंडात जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या देशांत पोचवले. विषरहित शेतीचे प्रयोग करून येथील शेतकऱ्यांनी विदेशी मार्केट काबीज केले. मात्र, आता या शेतकऱ्याला पुन्हा निसर्गाच्या पुढे हात टेकायची वेळ आली आहे. या भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता राहत आहे. यामुळे डाळिंबाच्या मुळ्या कुजत आहेत. त्याचबरोबर तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मूळ कुजल्याने कमजोर झालेले झाड तेल्यामुळे उन्मळून पडत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब बाग काढण्यास सुरुवात केली आहे.

राख आणि परिसरात गेल्या तीन वर्षांत वेळेवर व जास्तीचा पाऊस पडत आहे. हाच पाऊस आमच्या डाळिंब शेतीसाठी घातक ठरतो आहे. दुष्काळात टँकरने पाणी घालून सुद्धा आम्हाला चांगले उत्पन्न मिळाले होते. पण, आता या परिसरातील ९०० एकर क्षेत्रातील डाळिंब काढावे लागले आहे. कीटकनाशक आणि इतर औषधांच्या खर्चाने मेटाकुटीला आला आहे. या औषधांच्या छापील किमती आणि प्रत्यक्ष विक्रीतील किमतीत मोठा फरक आढळून येतो. कंपन्या जास्त किमती छापत आहेत. यामध्ये कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना औषधावर अनाठायी खर्च करावा लागत असल्याचे राख येथील शेतकरी शांताराम पवार यांनी सांगितले.

माझ्याकडे १७ एकर डाळिंब होते. पण मुळकूज आणि तेल्या रोगामुळे संपूर्ण बाग काढून टाकावी लागली आहे. यातील तीन एकर बाग आताच काढून टाकली आहे. ही बाग वाचवण्यासाठी चार लाख खर्च केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने ती बाग काढून टाकली. आता आमच्या पुढे बेकारीच मोठं संकट उभ राहिले आहे.

महेंद्र माने, शेतकरी

२५ नीरा

डाळिंबाच्या बागेवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.