शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

Aditya Thackrey: आमचं सरकार आलं कि दोषींवर कारवाई करू; आदित्य ठाकरे, पुणे पूरग्रस्त भागात पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:38 IST

पूरग्रस्त भागातील लोकांचा संसार वाहून गेला, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पुणे : पुण्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यावेळी मर्यादेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले. त्या रात्री जलसंपदा विभागाने इशारा देऊनही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी भागातील जवळपास  चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यात झालेल्या अताेनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला.  त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहगड रोड भागातील नागरिकंना भेट दिली. तर आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी कारण्याबरोबरच तेतेहील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीसुद्धा प्रशासनावर टीका केली आहे. 

      आदित्य ठाकरे म्हणाले, पाणी सोडलं तेव्हा न सांगता सोडल गेलं. तेही कित्येक जास्त पटीने सोडलं गेलं. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी आता लोकांशी संवाद साधला. त्यांचे कपडे, घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. त्याची योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. डोळयादेखत, नदीपात्रात राडारोडा टाकला जातोय. नदीपात्र साठी गुजरात मॉडेल वापरलं जातंय. साबरमती मॉडेल कॉपी पेस्ट करून नदी सुधार प्रकल्प करणार आहेत आहेत. हे चुकीचं वाटत आहे. यासंदर्भात मी प्रेझेंटेशन यापूर्वी दिलेलं होतं. नदी सुधारला विरोध नाही पण मी स्थगिती दिली होती.  त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. या पूरपरिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आम्ही करू असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेfloodपूरRainपाऊसWaterपाणीDamधरणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती