शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

महाराष्ट्राचे योगदान मांडण्याची संधी

By admin | Updated: December 12, 2014 00:11 IST

संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांमध्ये काय संबध आहे, यासाठी हे संमेलन आहे. महाराष्ट्राचे स्थान व योगदान देशासमोर मांडण्याचे काम या संमेलनातून करणार आहे,

पुणो : संतसाहित्य आणि आधुनिक साहित्य यांमध्ये काय संबध आहे, यासाठी हे संमेलन आहे. महाराष्ट्राचे स्थान व योगदान देशासमोर मांडण्याचे काम या संमेलनातून करणार आहे, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक व तुकाराममहाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोरे निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनातर्फे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड, माजी आमदार उल्हास पवार, परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कार्यवाहक प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, संजय नहार 
उपस्थित होते. या वेळी विविध संस्थांतर्फे मोरे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
 
हा क्षण माङयासाठी एक स्वप्न आहे. सदानंद यांना लहानपणापासून वाचनांची खूप आवड होती. त्यांना लहानपणापासून प्रवचनाची आवड होती. मी त्यांच्या वाक्यरचनेतील चुका काढीत असे.
- हिराबाई मोरे, डॉ. सदानंद मोरे यांच्या मातोश्री
 
नेमाडे यांचे विधान चुकीचे
शेजवलकर म्हणाले, ‘‘साहित्य संमेलन हे एक सांस्कृतिक संमेलन आहे. या संमेलनात प्रत्येक नागरिकाने सहभागी झाले पाहिजे. भालचंद्र नेमाडे यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनीही या संमेलनात सहभागी व्हावे. सवाई गंधर्वमध्ये सहभागी होणा:या लोकांनाही ते नावे ठेवतील.’’
 
देशातील प्रांता-प्रांतांतल्या भाषांची चर्चा  व्हायला पाहिजे. विशेषत:, पंजाब आणि महाराष्ट्रामधील भाषांचा अभ्यास व्हायला पाहिजे. दोन्ही राज्यांमध्ये असणारे नाते जपायला पाहिजे. पूर्वीच्या काळी भारतामधल्या सर्व राज्यांत मराठय़ांचे राज्य होते आणि त्या काळात इंग्रजांना मराठी भाषा शिकावी लागत असे. मराठी भाषेचे 18व्या शतकात एवढे महत्त्व असेल, तर 21व्या शतकात मराठय़ांची मराठी भाषेविषयीची काय जबाबदारी आहे, हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मराठी भाषेचे महत्त्व खूप मोठे आहे. संतसाहित्याची संकुचित रचना आपल्या माणसांत आहे.- डॉ. सदानंद मोरे