भोर: भाटघर धरणातून सातत्याने होणा-या विसर्गामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. पाणी कमी झाल्यामुळे कांबरे (ता.भोर) येथे भाटघर धरणात गेलेले कांबरेश्वराचे मंदीर बाहेर आले आहे. प्राचीन असलेले हे मंदीर पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील नागरीक या ठिकाणी येत आहेत. भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते .धरणातील पाणी कमी झाल्याने मंदीर पाण्या बाहेर आले आहे. वेळवंड नदीमध्ये प्रचिन असे पांडव कालीन शिवमंदीर आहे. या मंदीराचे मुळ नाव कर्मगरेश्वर आहे. परंतु हे मंदीर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे कांबरेश्वर नावाने ओळखले जाते. या मंदीराचे वैशिष्टये म्हणजे पांडवकालीन असुन ते पांडवांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. मे व जुन दोन महिनेच हे मंदीर पाण्याबाहेर असते. पुर्वी धरण नव्हते त्यावेळी मंदीराच्या जागेवर शेती होती. दरवर्षी, पडणा-या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर वाहात असलेल्या गाळामुळे मंदीर जमिनीखाली गेले आहे. मात्र मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम असुनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडी फार मोडतोड झाली आहे. मंदीरात स्वयंभु शिवलिंग असुन तसेच पार्वती मातेची मूर्ती व नंदी आहे.
भाटघर धरणातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:34 IST
भोर पासुन सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदीर आहे. हे मंदीर १० महिने पाण्यात असते .
भाटघर धरणातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर
ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा झाला कमी : दर्शनासाठी नागरिकांची गर्दीॅ