शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

...तरच बिबट्याचे हल्ले थांबतील! आमदारांनी तज्ज्ञांचा घ्यावा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:46 IST

तज्ज्ञांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून उपायांची यादी दिली असून त्याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष

पुणे : बिबट्यांची संख्या प्रचंड वाढल्याने मानव-बिबट संघर्ष वाढत आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी सरकारने १५ आमदारांची समिती स्थापन केली आहे. त्यात वन्यजीव विषयातील तज्ज्ञांची संख्या अधिक हवी होती. तज्ज्ञांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून उपायांची यादी दिली जात आहे. परंतु, त्याकडे सरकार मात्र दुर्लक्ष करीत आहे. ठोस धोरण करून संरक्षित क्षेत्रात बिबट्याला खाद्य उपलब्ध केले, तरच हल्ले थांबतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड-राजगुरूनगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्या परिसरात दररोज कुठे ना कुठे बिबट नागरिकांवर हल्ला करत आहेत. पुणे शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे त्यावर ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आता जागे झाले असून, उपायोजना करण्यासाठी १५ आमदारांची समिती केली आहे. हे आमदार संबंधित परिसराचा दौरा करून अहवाल सादर करणार आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून बिबट्यांवर माजी वनअधिकारी प्रभाकर कुकडोलकर हे अभ्यास करत आहेत. त्यांचे बिबट-मानव संघर्षावर पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहे. त्यात त्यांनी उपाययोजना काय करता येतील, ते दिले आहे. त्यामुळे सरकारने कुकडोलकर यांच्या उपाययोजनांसाठी उपयोग करून घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो. बिबट्यांची संख्या प्रचंड वाढल्याने खास त्यांच्यासाठी ठोस धोरण करणे आवश्यक आहे. भीमाशंकर अभयारण्यात पूर्वी बिबट्याचा अधिवास होता. त्यानंतर उसाच्या शेतात आता बिबटे स्थलांतरित झाले आहेत. भीमाशंकरमध्ये मात्र एकही बिबट्या पहायला मिळत नाही. उसामुळे बिबट्यांचे प्रजननही वाढत असून, त्यांना संरक्षणही मिळत आहे.

उसाच्या शेतात नवे घर

भीमाशंकर परिसरात बिबट्याचे खाद्य चिंकारा, चितळ, हरीण, काळवीट यांची संख्या कमी झाली. त्यांचा अधिवास असलेला भाग कमी झाला. त्यामुळेच त्यांना अन्नासाठी इतरत्र भटकावे लागते. उसाच्या शेतीमुळे तर त्यांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले. त्यामुळे मादी बिबट एकावेळी तीन-चार बछड्यांना जन्म देते. उसाचे क्षेत्र त्यांच्या बछड्यांसाठी अतिशय सुरक्षित असते.

प्रजोत्पादन केंद्रे हवीत

बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. बिबट्यांसाठी खास चितळ, हरीण, काळवीट, चिंकारा या प्राण्यांची प्रजोत्पादन केंद्रे तयार केली पाहिजेत. त्यामुळे बिबट्यांना खायला मिळू शकते. जर त्यांच्या अधिवासात योग्य खाद्य मिळाले, तर ते बाहेर भटकंती करणार नाहीत, असा उपाय माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने सांगितला आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याMLAआमदारforest departmentवनविभागGovernmentसरकार