शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

.... तरच ‘कौटुंबिक’लॉकडाऊन सुखाचा..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 9:55 PM

आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी..

आमच्या शेजारी राहणा-या आजी रात्री मला फोनवर सांगत होत्या कि, बघ ना,नातीने आत्ता रात्री आठ वाजता वॉशिंग मशीन लावलंय, आणि कानात इअरफोन अडकवून तो लॅपटॉप समोर घेऊन बसलीय.आता रात्री अपरात्री धुणं वाळत घालेल. काळ वेळेचं काही भान नाही. आजींचा त्रागा ऐकून मी म्हटले,आजी, तुम्ही दुर्लक्ष करा... ते एवढं सोप्प आहे?  आज ' लॉकडाऊन 'मुळे सध्या सगळी मंडळी घरीच आहेत.एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणं हे भाग्य असले तरी सदासर्वकाळ एकत्र राहाण्याने काही प्रश्न नक्कीच निर्माण झालेत. ताणाच्या या परिस्थितीत एकमेकांच्या उणिवा प्रकर्षांने समोर येत आहेत.या काळात आपल्या सगळ्यांनाच आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे आहे..आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी असे म्हणावेसे वाटते...  आज घरातल्या गृहिणीवर अतिरिक्त ताण आलाय. ती तिच्या ऑफिसचे काम घरुन करत असेल तर तिला दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहावे लागतयं. पण ती केवळ गृहिणी असेल तरी तिचे काम वाढलेले आहेच कारण कामवाल्या बायका आज मदतीला नाहीत. त्यामुळे घरात कामाच्या वाटणीला पर्याय नाही, हे सत्य आहे. प्रत्येकाने समजून उमजून आपली जबाबदारी ओळखून कामाचा वाटा उचलायला हवा.महत्वाचे हे की कामांची एकदा वाटणी झाली की परस्परांनी त्यात ढवळाढवळ करायची नाही. हे ठरवून टाका. नवरा,मुलं यांना कामं सोपवून दिली की ते त्यांच्या पध्दतीने करतील. फारतर एकदा आठवण करुन द्यायला हरकत नाही. पण ती कामं पूर्ण करायची त्यांची जबाबदारी हे एकदा ठरवून टाकायचे. घरात पसारा पडलाय.कोण येतयं आता घरी? म्हणून तिकडे कोणाचेच लक्ष नाही.आपण केवळ त्रागा करुन उपयोगी नाही. मुलांना चारवेळा पसारा आवरा सांगायचे, ती आपलं ऐकत नाहीत. चिडचिड करण्याखेरीज काहीच होत नाही. मग शेवटी आपणच उचलून ठेवतो. त्यापेक्षा आधीच उचलला असतां तर? चिडचिड त्रागा वाचला असता.वातावरण देखील डिस्टर्ब झालं नसतं. हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही हे मला मान्य आहे.

पण आत्ता या दिवसात आपल्याला मानसिक शांतता हवी आहे. त्यासाठी हा एक लहानसा प्रयत्न आहे. कारण आत्ता घरात नसते वादविवाद नको आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे काही दिवस थोडे फार दुर्लक्ष करायला काय हरकत आहे? भांडी अगदी लखलखीत स्वच्छ नाही निघाली, धुणं नीट न झटकता वाळत घातले गेले? तर फारसं काही बिघडत नाही. त्यामुळे तिकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे केव्हाही श्रेयस्कर.दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असण्याचा. हातात वेळ आहे दुसरं काही काम नाही म्हणून सतत कोणता ना कोणता तरी स्क्रिन डोळ्यांसमोर असणं हे तितकेसे बरं नाही. घरातल्या मंडळींशी गप्पा टप्पा न मारता केवळ आभासी जगात रमणं तितकेसे बरोबर नाही. दिवसातला काही ठराविक काळ तरी एकत्र घालवा. चहा,नाष्टा,जेवण,चॅनल्स वरील एखादी मालिका सगळ्यांनी मिळून पहा. त्यांवर चर्चा करा.या सगळ्या बरोबर अजून एक महत्त्वाचे ते म्हणजे स्वताचा स्वताशी संवाद असणं आवश्यक. आपल्याला आवडेल ती गोष्ट मग ते वाचन असो की शिवणकाम, लिखाण यांसह काहीही असो,आपल्या आवडीचे काहीही आवर्जून करणे व त्यासाठी वेळ देणे महत्वाचे. हाताशी वेळ आहे तर नवनवीन गोष्टी करुन बघतां येतील. जुन्या काही गोष्टी आठवून बघा. पूर्वी कामाच्या व्यापात, संसाराची जबाबदारी निभावताना जे काही आवडीचे करायचे राहून गेले आहे ते पुन्हा सुरु करता येईल.त्या निमित्ताने आपली बकेट लिस्ट पुन्हा एकदा नव्याने तयार करता येईल. स्वत:ची आवड, एकटेपणा जपायला हवा. तरच हे दिवस आनंदाचे, शांततेचे जातील. आणि पर्यायाने पुढीलकाळात देखील कौटुंबिक स्वास्थ जपले जाईल.

- अ‍ॅड. भाग्यश्री चौथाई 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यMeditationसाधना