शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 18:45 IST

भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही पण जे दोन चार टक्के लोक हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात

बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत. ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांचे काम असते लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवणे. मात्र सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 बारामती येथे रविवारी ( दि. २६) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच यावेळी इंदापूर व बारामती मध्ये भाजप युवा मोर्चाच्या 52 शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे व इतर विरोधकांवर टीका केली. 

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतर आमच्याही सभा होतील. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जनतेच्या कोर्टामध्ये आता याचा फैसला होईल. महाराष्ट्रातील जनतेला आता टीकाटिप्पणी नको आहे. त्यांना विकास हवा आहे, असे बावनकुळे म्हणाले. 

सांगवी ( ता. बारामती ) येथील शेतकऱ्यांनी नीरा नदी मधील प्रदूषणाबाबत अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना देखील निवेदन दिले होते. येथील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना या परिसरात राहणे मुश्किल झाले आहे. परिणामी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराला भेट देत येथील पाहणी केली. यावर बोलताना ते म्हणाले, यापूर्वीच्या तक्रारींबाबत कोणी काय कारवाई केली हे पाहत बसण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येथील समस्येवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

दरम्यान, नीरा नदीमध्ये या परिसरातून अनेक कारखान्याचे प्रदूषित पाणी तसेच बेकायदेशीर कत्तलखान्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर मिसळले जात आहे. त्यामुळे एक प्रकारचा उग्र वास या ठिकाणी येत असतो, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, हे सर्व भयंकर आहे. निश्चित सरकारने यावर उपाययोजना करायला हवी. प्रश्न मी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. मला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न मी हा प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे. नीरा नदीचे हे प्रदूषित पाणी पंढरपूर पर्यंत जाते. त्यामध्ये भाविक आंघोळ करतात अत्यंत भयंकर आहे, याबाबत मी सरकारशी बोलणार आहे असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा