शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 18:45 IST

भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही पण जे दोन चार टक्के लोक हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात

बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत. ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांचे काम असते लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवणे. मात्र सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

 बारामती येथे रविवारी ( दि. २६) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच यावेळी इंदापूर व बारामती मध्ये भाजप युवा मोर्चाच्या 52 शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे व इतर विरोधकांवर टीका केली. 

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतर आमच्याही सभा होतील. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जनतेच्या कोर्टामध्ये आता याचा फैसला होईल. महाराष्ट्रातील जनतेला आता टीकाटिप्पणी नको आहे. त्यांना विकास हवा आहे, असे बावनकुळे म्हणाले. 

सांगवी ( ता. बारामती ) येथील शेतकऱ्यांनी नीरा नदी मधील प्रदूषणाबाबत अनेक वेळा प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना देखील निवेदन दिले होते. येथील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना या परिसरात राहणे मुश्किल झाले आहे. परिणामी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिसराला भेट देत येथील पाहणी केली. यावर बोलताना ते म्हणाले, यापूर्वीच्या तक्रारींबाबत कोणी काय कारवाई केली हे पाहत बसण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून येथील समस्येवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

दरम्यान, नीरा नदीमध्ये या परिसरातून अनेक कारखान्याचे प्रदूषित पाणी तसेच बेकायदेशीर कत्तलखान्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर मिसळले जात आहे. त्यामुळे एक प्रकारचा उग्र वास या ठिकाणी येत असतो, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, हे सर्व भयंकर आहे. निश्चित सरकारने यावर उपाययोजना करायला हवी. प्रश्न मी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. मला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न मी हा प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे. नीरा नदीचे हे प्रदूषित पाणी पंढरपूर पर्यंत जाते. त्यामध्ये भाविक आंघोळ करतात अत्यंत भयंकर आहे, याबाबत मी सरकारशी बोलणार आहे असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा