शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:47 IST

सामान पाणीपुरवठा योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही

पुणे: समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारलेल्या ४३ पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण होऊनही जलवाहिन्या जोडल्या गेल्या नाहीत. परिणामी या टाक्यांचा वापर होत नाही. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पूर्ण झालेल्या ६५ टाक्यांपैकी टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा उपयोग केला जात आहे. हे उत्तर धक्कादायक होते. तेच प्रशासन आता २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचे सांगत आहे.

महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबविण्यासाठी आणि पुणेकरांना उच्च दाबाने समान पाणीपुरवठा करण्यासाठी अडीच हजार कोटींची समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे.

योजनेच्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर, ७ नागरी सुविधा केंद्रे आणि ५ नवीन पंपिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची कामे करण्यास आजवर चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकाच म्हणते....

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८६ पाणी साठवण टाक्यांपैकी ६५ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० टाक्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली असून, ९ टाक्यांची कामे ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास झाली आहेत. दोन टाक्यांना अद्याप जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. काम पूर्ण झालेल्या ६५ पैकी केवळ २२ टाक्यांचा वापर पाणीपुरवठ्याच्या कामासाठी सुरू आहे. उर्वरित ४३ टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या व वितरण करणाऱ्या वाहिन्या जोडलेल्या नाहीत. त्यामुळे या टाक्यांचा वापर मागील अनेक महिन्यांपासून होत नाही.

केवळ एकाच टाकीचा होतो वापर

माहिती अधिकार कार्यकर्ते भरत जैन सुराणा यांनी माहिती अधिकारात समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीसंदर्भात माहिती मागितली होती. त्या अर्जावर प्रशासनाने जानेवारीत दिलेल्या उत्तरात काम पूर्ण झालेल्या टाक्यांपैकी कात्रज येथील सर्व्हे नं. १२७ मधील केवळ एका टाकीचा वापर सुरू असल्याचे सांगितले हाेते. तेच प्रशासन आता मात्र पाणी पाणीपुरवठ्यासाठी २२ टाक्यांचा वापर केला जात असल्याचे तोंडी सांगत आहे. मग एका महिन्यात २१ टाक्या कार्यान्वित झाल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

जास्त काही बोलू शकत नाही...

शहरातील नागरिकांना समान व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मोठा गाजावाजा करून आणण्यात आली. चार वेळा मुदतवाढ देऊनही योजनेचे काम ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे प्रशासन सांगते. मात्र, ज्या भागात योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागात पूर्वीप्रमाणेच पाण्याच्या समस्या आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनीच सांगितले की, ‘या योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही.’ अधिकाऱ्याच्या या उत्तराने योजनेच्या माध्यमातून पांढरा हत्ती तर पोसला जात नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीFamilyपरिवारcommissionerआयुक्तMONEYपैसाGovernmentसरकारDamधरण