शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा वापर सुरु; पुणे महापालिकेचे धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:47 IST

सामान पाणीपुरवठा योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही

पुणे: समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारलेल्या ४३ पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण होऊनही जलवाहिन्या जोडल्या गेल्या नाहीत. परिणामी या टाक्यांचा वापर होत नाही. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, समान पाणीपुरवठा योजनेतील कामे पूर्ण झालेल्या ६५ टाक्यांपैकी टाक्यांपैकी केवळ एका टाकीचा उपयोग केला जात आहे. हे उत्तर धक्कादायक होते. तेच प्रशासन आता २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचे सांगत आहे.

महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबविण्यासाठी आणि पुणेकरांना उच्च दाबाने समान पाणीपुरवठा करण्यासाठी अडीच हजार कोटींची समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे.

योजनेच्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर, ७ नागरी सुविधा केंद्रे आणि ५ नवीन पंपिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची कामे करण्यास आजवर चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकाच म्हणते....

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८६ पाणी साठवण टाक्यांपैकी ६५ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० टाक्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली असून, ९ टाक्यांची कामे ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास झाली आहेत. दोन टाक्यांना अद्याप जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. काम पूर्ण झालेल्या ६५ पैकी केवळ २२ टाक्यांचा वापर पाणीपुरवठ्याच्या कामासाठी सुरू आहे. उर्वरित ४३ टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या व वितरण करणाऱ्या वाहिन्या जोडलेल्या नाहीत. त्यामुळे या टाक्यांचा वापर मागील अनेक महिन्यांपासून होत नाही.

केवळ एकाच टाकीचा होतो वापर

माहिती अधिकार कार्यकर्ते भरत जैन सुराणा यांनी माहिती अधिकारात समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीसंदर्भात माहिती मागितली होती. त्या अर्जावर प्रशासनाने जानेवारीत दिलेल्या उत्तरात काम पूर्ण झालेल्या टाक्यांपैकी कात्रज येथील सर्व्हे नं. १२७ मधील केवळ एका टाकीचा वापर सुरू असल्याचे सांगितले हाेते. तेच प्रशासन आता मात्र पाणी पाणीपुरवठ्यासाठी २२ टाक्यांचा वापर केला जात असल्याचे तोंडी सांगत आहे. मग एका महिन्यात २१ टाक्या कार्यान्वित झाल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

जास्त काही बोलू शकत नाही...

शहरातील नागरिकांना समान व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मोठा गाजावाजा करून आणण्यात आली. चार वेळा मुदतवाढ देऊनही योजनेचे काम ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे प्रशासन सांगते. मात्र, ज्या भागात योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागात पूर्वीप्रमाणेच पाण्याच्या समस्या आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनीच सांगितले की, ‘या योजनेचा फायदा किती आणि तोटा किती, हे आम्हालाच अजून समजत नाही. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही.’ अधिकाऱ्याच्या या उत्तराने योजनेच्या माध्यमातून पांढरा हत्ती तर पोसला जात नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीFamilyपरिवारcommissionerआयुक्तMONEYपैसाGovernmentसरकारDamधरण