शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

ढगाळ हवामानामुळे कांदा पडतोय ‘आजारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 15:30 IST

बाजारभावाने तारल्याने उत्पादक कष्टाने जगतोय

ठळक मुद्देकांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटकाचालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक गेले वाया पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट

शिरूर ( शेलपिंपळ्गाव ) : वातावरणातील हवामान बदलाचा मागास कांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटका बसू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हंगामातील मागास गहू, मका, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर मावा, तसेच करपा रोगराईचे सावट पसरू लागले आहे. परिणामी रोगराईच्या विळख्यातील पिकांचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात शेतकऱ्यांना दूषित हवामानाशी दोन हात करीत पीक उत्पादन काढावे लागत आहे. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदापिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. मात्र,  थंडीच्या आगमनानंतर कांद्याला बोटावर मोजता येतील इतके दिवसच पोषक वातावरण प्राप्त झाले होते. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालावधीत पोषक हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी, कांदा उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे.....चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक वाया गेले आहे. सध्या परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला चांगला दर प्राप्त होत आहे. मात्र पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट जाणवत आहे. परंतु बाजारभावाने तारल्याने पिकापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या मागास कांदा लहरी हवामानाला बळी पडत आहे.- सर्जेराव मोहिते, शेलपिंपळगाव

टॅग्स :ShirurशिरुरonionकांदाFarmerशेतकरीweatherहवामान