शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

ढगाळ हवामानामुळे कांदा पडतोय ‘आजारी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 15:30 IST

बाजारभावाने तारल्याने उत्पादक कष्टाने जगतोय

ठळक मुद्देकांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटकाचालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक गेले वाया पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट

शिरूर ( शेलपिंपळ्गाव ) : वातावरणातील हवामान बदलाचा मागास कांदा पिकासह हंगामातील अन्य पिकांनाही मोठा फटका बसू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हंगामातील मागास गहू, मका, फुलझाडे, पालेभाज्या, फळपिके, कोबी, फ्लॉवर तसेच महत्त्वाच्या तोडीव पिकांवर मावा, तसेच करपा रोगराईचे सावट पसरू लागले आहे. परिणामी रोगराईच्या विळख्यातील पिकांचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात शेतकऱ्यांना दूषित हवामानाशी दोन हात करीत पीक उत्पादन काढावे लागत आहे. रब्बी हंगामातील सुरुवातीच्या आगाप कांदापिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. मात्र,  थंडीच्या आगमनानंतर कांद्याला बोटावर मोजता येतील इतके दिवसच पोषक वातावरण प्राप्त झाले होते. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालावधीत पोषक हवामानाने साथ सोडल्याने पिकांना रोगराईने ग्रासले आहे. परिणामी, कांदा उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे.....चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदापीक वाया गेले आहे. सध्या परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला चांगला दर प्राप्त होत आहे. मात्र पिकाच्या एकरी उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट जाणवत आहे. परंतु बाजारभावाने तारल्याने पिकापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या मागास कांदा लहरी हवामानाला बळी पडत आहे.- सर्जेराव मोहिते, शेलपिंपळगाव

टॅग्स :ShirurशिरुरonionकांदाFarmerशेतकरीweatherहवामान