शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहाशे महिला ४४ बसच्या मालकिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST

----------------- सैनिकपत्नींची यशोगाथा : ‘पीएमपीएल’ची मोलाची साथ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माजी सैनिकांच्या पत्नींनी बचत गट स्थापन करून ...

-----------------

सैनिकपत्नींची यशोगाथा : ‘पीएमपीएल’ची मोलाची साथ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : माजी सैनिकांच्या पत्नींनी बचत गट स्थापन करून पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात पाऊल टाकले. कोरोना आपत्तीतही त्या ठाम राहिल्या. कुटुंबात मागेमागे राहणाऱ्या महिलांसाठी नवा आदर्श तयार केला.

बचत गटाच्या माध्यमातून त्यांंनी ही कामगिरी केली. कोरोना अनलॉकनंतर सर्व बस व्यवस्थित सुरू झाल्यावर त्या आता अधिक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत.

किमान ११ व जास्तीत जास्त १५ महिलांचे ४४ बचत गट आहेत. त्यातील बहुतांश महिला माजी सैनिकांच्या पत्नी आहेत, काही विधवा आहेत. सातारा, पुणे व अहमदनगर व अन्य १० जिल्ह्यांमधील त्या रहिवासी आहेत. सातव्या बेळगाव मराठा लाइट इन्फंट्रीमधील निवृत्त सैनिक सुरेश गोडसे यांनी या महिलांचे बचत गट तयार केले. त्यांची कंपनी स्थापन केली. प्रत्येकीने ८० हजार रुपये जमा केले. माजी सैनिक कल्याण मंडळाने बचत गटाला १० लाख रुपयांचे अनुदान दिले. बँक ऑफ महाराष्ट्रने साडेसहा लाख रुपये कर्ज दिले. असे प्रत्येक बससाठी करून या कंपनीने प्रति ४१ लाख रुपये किमतीच्या ४४ प्रवासी बस खरेदी केल्या.

पीएमपीएलने बयाणा रक्कम, निविदा ही प्रक्रिया मागे घेत प्रत्येक किलोमीटरला ५७ रूपये १७ पैसे या दराने सर्व बस भाडे तत्वावर स्वीकारल्या. बसचा फक्त वाहक व वेळापत्रक पीएमपीएलचे बाकी चालक, देखभाल दुरूस्तीची सर्व जबाबदारी कंपनीची. रोज किमान २०० किलोमीटरचे भाडे द्यायची हमीही दिली.

हे सगळे नियमित झाले व कोरोना टाळेबंदी लागली. पीएमपीएलची वाहतूक बंद झाली. नव्या गाड्या जागेवर पडून होत्या. बँकेने, पीएमपीएलने परिस्थिती लक्षात घेत आर्थिक व्यवहार पुढे ढकलले. टाळेबंदी उठल्यावर पुन्हा सगळे नीट सुरू झाले आहे. पीएमपीएलने दरमहा बिल अदा करावे, अशी विनंती कंपनीने महापौर व पीएमपी अध्यक्षांना केली आहे. आता ही कंपनी सातारा परिसरात मॉल सुरू करण्याच्या तयारीत आहे.

चौकट

“बचत गटातील अनेक महिला आता कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी तयार होत आहेत. माजी सैनिक कल्याण मंडळाचे राज्याचे उपसंचालक निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, तत्कालीन महापौर मुक्ता टिळक व पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे यांचे मोठे सहकार्य मिळाले,” असे कंपनीचे प्रवर्तक सुरेश गोडसे यांनी सांगितले.