शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अरे बापरे ! 68 हजार आयटी कर्मचाऱ्यांना भरली धडकी; पगार कपात, सक्तीने राजीनामे घेणे सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:32 IST

महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक आयटी,आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबापुढे मोठी समस्या

ठळक मुद्देबेकायदा कमी करणे, वेतन कमी करणे,सक्तीने राजीनामा देणे, इतर विविध समस्याविरोधात याचिकाआतापर्यंत अनेकदा कामगार विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन

पुणे :  आयटी कर्मचा-यांची मनमानी सुरुच असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत 68 हजार आय टी कर्मचा-यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना कामावरुन कमी करणे, पगार कपातीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यासंबंधी कामगार आयुक्तांकडे दाद मागण्यात आली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांची कपात न करण्याचे आदेश दिले असताना देखील त्यांना वेगवेगळी कारणे दाखवून घरी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. 

 आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ आणि त्याच्या संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याण, फायदे आणि हक्कांसाठी काम करणा-या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेनेटने 68000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत कामगार विभागाला निवेदन दिले आहे. आणि बेकायदा कमी करणे, वेतन कमी करणे, सक्तीने राजीनामा देणे, इतर विविध समस्या याविरोधात कामगार विभाग आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांनी कोणतेही वाजवी कारण न देता आपले कर्मचारी संपविणे सुरू केले आहे आणि त्यांचे वेतन रोखण्यास सुरवात केली आहे.  जनहित याचिकेसाठी सेनेटने सर्वोच्च न्यायालयात एनआयटीईएस यांनी देखील जनहित याचिका दाखल केली होती. मात्र त्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. केवळ पुणेच नव्हे तर मुंबईतील आयटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यातील सहा लाख आयटी कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती सेनेटच्या वतीने देण्यात आली आहे. 

राज्यातील ब-याच आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा बेकायदा सामूहिक टर्मिनेशन, मोबदला व संपूर्णपणे उल्लंघन करून पगाराची बेकायदेशीर कपात करण्याची मोहीम सुरू केली आहे आणि सरकारकडून जारी केलेल्या निदेर्शांचे व सल्लाांचे उल्लंघन केले आहे.  खासगी कंपन्यांना कोणतेही बंधनकारक आदेश जारी न झाल्यास हजारो कर्मचारी रोजगाराच्या आणि उत्पन्नाचे नुकसान होत आहेत. तसेच नोटीस कालावधी, शासकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे, रीट्रेंचमेंट नुकसान भरपाईची रक्कम, ग्रॅच्युइटीची रक्कम, रजा एन्कॅशमेंट इत्यादीसारख्या कोणतीही प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नसल्याचे सेनेटच्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक आयटी,आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबापुढे मोठी समस्या निर्माण झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.   *आतापर्यंत अनेकदा कामगार विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. शासनाचा आदेश आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? कामगार प्रशासन संबंधित कंपनीला नोटीस पाठवते. मात्र त्याची दखल कंपनीकडून घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे यात शासनाचा प्रत्यक्ष सहभाग असण्याची गरज आहे. केवळ कंपन्यांना नोटीस पाठवून काही होणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी एका आयटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेवटी न्यायासाठी तो पर्याय स्वीकारायचा का ? हा प्रश्न यातुन पुढे आला आहे.

- हरप्रीत सलुजा (सरचिटणीस, नैशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सेनेट)

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानState Governmentराज्य सरकारjobनोकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस