शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

एल निनो आणि मॉन्सूनचा संबंध नाही :हवामान अभ्यासकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 9:25 PM

१९५० ते २००० सालापर्यंत एकूण १३ वेळा एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा एन निनो असताना देशात दुष्काळ पडला होता़. त्यामुळे मॉन्सून या प्रचंड मोठ्या असलेल्या सिस्टिमपुढे तुलनेने लहान एल निनो किंवा ला निनो  यांचा काही एक संबंध नसल्याचा दावा भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी केला आहे़

पुणे : १९५० ते २००० सालापर्यंत एकूण १३ वेळा एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा एन निनो असताना देशात दुष्काळ पडला होता़. त्यामुळे मॉन्सून या प्रचंड मोठ्या असलेल्या सिस्टिमपुढे तुलनेने लहान एल निनो किंवा ला निनो  यांचा काही एक संबंध नसल्याचा दावा भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी केला आहे़. अमेरिकन क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला असून त्यामुळे २०१९ मध्ये भारतात दुष्काळ आणू शकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे़. यंदा देखील स्कायमेंटने मॉन्सून खराब होईल असा अंदाज एल निनोला गृहित धरुन व्यक्त केला आहे़. 

याबाबत किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केला असता एल निनो किंवा ला निनो चा मॉन्सूनशी काही संबंध नाही़. एल निनोच्या भितीचा बागुलबुवा उभा केला गेला आहे़. एल निनोच्या सगळ्या वर्षात मात्र भारतावर दुष्काळ पडला नव्हता़. विशेष म्हणजे आतापर्यंत जितक्या वेळा एल निनो तयार झाला़. त्यातील निम्म्या वेळा त्याचा मॉन्सूनवर काडीचाही प्रभाव एल निनोने मॉन्सूनवर दाखविला नाही़. या उलट १९९७ मध्ये एल निनो सर्वात जास्त उष्ण होता आणि भारतात दुष्काळ पडणार अशी भाकिते हवामान विभागासह अनेक ठिकाणचे हवामान संशोधक करीत होते़. त्या वर्षी भारतात मॉन्सून भरभरुन झाला होता़ विषववृत्तीय भारतीय सागरातील आवर्तन निर्माण झाल्याने  सी सॉ परिणाम होऊन आवर्तनाच्या आणि भारताच्या देखील पश्चिमेकडील भागात पाऊस वाढतो़.  तर आर्वतनाच्या पूर्वला पाऊस कमी होते, ही स्थिती एल निनो असताना देखील १९९७ आणि २००६ या वर्षी भारतासाठी वरदान ठरली असे शास्त्रीय कारण एस गाडगीळ या भारतीय संशोधकाने करंट सायन्समध्ये दिली आहेत़ .

मॉन्सूनचा विचार करताना  दूरवरच्या या सागरी प्रवाहाचा विचार करणे म्हणजे बिरबल की खिचडी पकाना होय़. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ कोलारॅडोतर्फे व्यक्त करण्यात आलेल्या मतानुसार मॉन्सूनवर एल निनो च्या पडणाºया प्रभावाचा अंदाज देणे ही अवघड गोष्ट आहे़. एल निनोचा बागलबुवा करत शेतकºयांनी उगीचच घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही, असे असे किरणकुमार जोहरे यांनी सांगितले़. 

  • १९५० ते २००० या सालापर्यंत एकूण तेरा वेळा एल निनो होता़ १९५१, १९६५, १९९६६, १९७२, १९७४, १९७९, १९८२, १९८३, १९८६, १९८७, १९९१, १९९२, १९९७ या वेळी एल निनो होता़ त्यात केवळ तीन वेळा म्हणजे १९५१, १९६५ आणि १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता़ 

 

  • १८७१ ते २०१२ पर्यंतच्या कालावधीततील एल निनोची तीव्रता व मॉन्सूनचे बळ यांचा आलेख अभ्यासताना मॉन्सून आणि एल निनो यांचा काही संबंध आहे, याबद्दलच मुलभूत शंका निर्माण होते़ 

 

  • २०१५ साली प्रबळ एल निनो होता तर, २०१६ साली मात्र उष्ण वर्ष असून ला निना होता़ विशेष म्हणजे २०१८ मध्ये आॅगस्ट महिन्यानंतर मात्र मध्यम ला निना व नंतर २०१९ मध्ये पुन्हा एल निनो हा उष्ण सागरी प्रवाह निर्माण होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे़ अशा वेळी सागरी प्रवाहांची निर्मिती आणि त्यांचे आर्वतन या बाबत विश्लेषण अधिकाधिक जटील होत जाते़ त्यामुळे मॉन्सून आणि एल निनो किंवा ला निनो यांचा काही एक संबंध नाही़ :किरणकुमार जोहरे
टॅग्स :weatherहवामानRainपाऊस