शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 7:54 PM

शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली.

ठळक मुद्देआपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे आयुक्तांचे पत्र

पुणे : शहरात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे. पालिकेच्या मुख्य सभेने पर्वती येथील सर्व्हे क्रमांक १३५ येथील फायनल प्लॉट क्र. २८ मधील पुरात बाधित झालेल्या २६ कुटुंबांचे आठ दिवसात जवळच्या परिसरात पुनर्वसन करण्याचा ठराव केला होता. परंतू, आयुक्तांच्या पत्रामुळे पुनर्वसन रखडण्याची चिन्हे आहेत. शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली. सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह ओढ्याशेजारील उद्याने, वास्तूंना या पुराचा तडाखा बसला. साधारणपणे २८ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी या पुरात गेला. पर्वतीमधील सर्व्हे क्रमांक १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांचेही पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरात बाधित झालेल्या या २६ कुटुंबांना आठ दिवसात एक किलोमीटरच्या आत उपलब्ध सदनिकांमध्ये पुनर्वसित करण्याचा ठराव करण्यात आला. पालिकेच्या गाळा वाटप नियमावलीमध्ये आपतकालीन परिस्थतीमध्ये बाधित झालेल्या कुटूंबांना सध्या समाविष्ट करण्यास तसेच राज्यसरकारची मान्यता मिळेल या भरवश्यावर आठ दिवसात पुर्नवसन करण्यास मान्यता देण्यात येत आहे असा ठराव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने केला होता. यासंदर्भात शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समिती मार्फत आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेला एक पत्र पाठविले आहे. पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब ही प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे त्यांचे पुर्नवसन करता येणार नाही असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधितांच्या आशांवर पाणी फेरले गेल्याची टीका होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfloodपूरFamilyपरिवारcommissionerआयुक्त