शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, पुण्याच्या गुन्हेगारांना अजितदादांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:19 IST

आम्ही पुण्याची गुन्हेगारी आता गांभीर्याने घेतली आहे, कोणालाही सोडले जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल

पुणे: आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पुण्यात गुन्हेगारीला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. अशातच कोथरूडमधील गोळीबाराच्या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. कालच्या घटनेत सामान्य नागरिकावर किरकोळ कारणांवरुन गोळीबार झाला. यावरून आता पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही. तर पोलिसानांही नागरिकांची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.    

गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री कोथरूड भागात गोळीबार झाला आहे. यावरून असे दिसते की, गुंडांना आपली दहशत निर्माण करायची आहे. त्यांना आता पोलिसांचा धाक राहीला नाही. या गुन्हेगारी टोळ्यांचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच फिरावे लागत असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. मागील वर्षीसुद्धा वनराज आंदेकर याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना तर पुण्याच्या मध्यवर्ती भागात नाना पेठेत घडली. त्याच वर्षी शरद मोहोळ याची कोथरूड भागात हत्या करण्यात आली होती. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीला सुरुवात झाल्याचे दिसते आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर काल घायवळ टोळीकडून सामान्य नागरिकावर गोळीबार झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागरपूरच्या दौऱ्यावर असताना पुण्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत विचारले असता त्यांनी या गुंडांना कडक शब्दात इशारा दिला आहे. अजित पवार म्हणाले, पुण्यात शहरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य सर्व काही वाढत आहे. मी आणि मुख्यमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहोत. पुण्याची लोकसंख्याही आता वाढली आहे. अधिकचे मनुष्यबळ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुण्याचा सर्वत्र विकास होत आहे. अशातच पुण्यात होणारी कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांकडून मकोका लावले जातील. त्यांचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल. आम्ही पुण्याची गुन्हेगारी आता गांभीर्याने घेतली आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.   

गुंडांवर कडक कारवाई व्हावी 

पुण्यात सामान्य नागरिकावर गोळीबार झाल्याने सर्व पुण्यातच भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा गुंडांवर कडक कारवाई करावी. त्यांना पोलिसांचा धाक राहिला पाहिजे. सामान्य नागरिकाला अशा प्रकारे त्रास सहन करावा लागू नये. तसेच कोणीही भीतीच्या छायेत राहू नये. अशा प्रकारे पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस