शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही', जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:29 IST

रात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असून केवळ पाळीव प्राण्यांवरच नव्हे, तर मनुष्यांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वारंवार होणाऱ्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, मनुष्यांवरही हल्ले वाढल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून जनजागृती आणि पंचनामे सुरू असले तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयश आले आहे. या संकटातून सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

पूर्व जुन्नर तालुक्यातील बेल्हा आणि परिसरात बिबट्यांची समस्या वर्षानुवर्षे जुनी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. ऊसशेतीच्या मुबलक उपलब्धतेमुळे बिबट्यांसाठी हे क्षेत्र हक्काचे निवासस्थान बनले आहे. पाण्याची सहज उपलब्धता आणि प्रजननासाठी अनुकूल वातावरण यामुळे बिबट्यांची संख्या वाढतच चालली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात सध्या ५ ते ६ बिबटे असावेत, त्यात काही बिबट्यांसोबत बछडेही दिसत आहेत. यामुळे दिवसा आणि रात्री कधीही बिबट्याचे दर्शन होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

गेल्या दोन ते चार दिवसांतच या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. शेळ्या, कालवडी यांसारख्या जनावरांवर हल्ले झाले असून, शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाकडून या घटनांचे रीतसर पंचनामे करण्यात येत आहेत, मात्र हे पुरेसे नसल्याचे शेतकरी सांगतात. "बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते, यामुळे कारवाईत विलंब होतो," असे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी, शेतकरी वर्गाला हातावर हात ठेवून बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

या भागातील शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागत आहे. "कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही. रात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे," अशी व्यथा एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली. केवळ पाळीव प्राण्यांवरच नव्हे, तर मनुष्यांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे बिबटे कोरड्या ठिकाणी येऊन हल्ले करीत असल्याचे निरीक्षण आहे. यामुळे परिसरातील मानवी जीवनावर संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

वनविभागाकडून या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. जनजागृती मोहिमा राबवल्या जात असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. "वर्षानुवर्ष ही समस्या असूनही वनखाते हतबल झाले आहे. कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी ठोस कारवाईची गरज आहे," अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. बिबट सफारीसारख्या पर्यटन उपक्रमांद्वारे या समस्येवर तोडगा काढता येईल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही स्पष्ट योजना दिसत नाही. या समस्येवर लक्ष केंद्रित करून लोकमतने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जनजागृतीसोबतच बिबट्यांना पकडण्यासाठी परवानग्या घेण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येत आहे." मात्र, शेतकरी वर्गाला हे आश्वासन पुरेसे वाटत नाही. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील ही समस्या केवळ स्थानिक नसून, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील वन्यप्राणी-मानवी संघर्षाचे प्रतिबिंब आहे. यावर शासन स्तरावरून धोरणात्मक गरज आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे जीवन अधिक धोकादायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरleopardबिबट्याFarmerशेतकरीforest departmentवनविभागNatureनिसर्गWaterपाणीriverनदी