शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

घराची नोंद नव्हती म्हणून मिळाले नाही घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

घोडेगाव : माळीणमध्ये घर बांधले. मात्र, घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात नव्हती. ३० जुलै रोजी डोंगराने अख्ख गाव गिळंकृत केले. ...

घोडेगाव : माळीणमध्ये घर बांधले. मात्र, घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात नव्हती. ३० जुलै रोजी डोंगराने अख्ख गाव गिळंकृत केले. या दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ लोक दगावले. ९ जण वाचले तर ३८ लोक बाहेरगवी असल्याने बचावले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. नव्या गावात सर्वांना घरे दिली. मात्र, आमच्या घराची ग्रामपंचायत नोंद नसल्याने आम्हाला घरे मिळाली नाही. गेल्या सात वर्षांपासून आम्ही आमची कैफीयत शासनापुढे मांडतो आहोत. मात्र, अद्यापही आमच्या मागणीची दखल न घेतल्याने आम्हाला पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागत असल्याची खंत अजूनही निवारा शेडमध्ये वास्तव्यास असलेल्या कमलबाई लेंभे व भीमराव झांजरे यांनी लोकमतकडे व्यक्त केली.

निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला दि. ३० जुलै रोजी ७ वर्ष पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी माळीण फाट्यावर पत्र्याचे निवारा शेड बांधून तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आघाणे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. येथे ६८ घरे बांधण्यात आली. १ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित नव्या गावाचा लोकार्पण सोहळा झाला. लोकांना नवीन घरे देण्यात आली.

मात्र, या नवीन गावात घर मिळाले नाही, अशी तक्रार कमलबाई लेंभे व भीमराव मारुती झांजरे या कुटुंबाने मांडली आहे. कमलबाई लेंभे त्यांचे माळीणमध्ये सामाईक घरे होते. दुर्घटनेच्या काही दिवस आधीच नवे घर बांधून पूर्ण झाले होते. यामुळे या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले. मात्र त्यांच्या घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही. त्यामुळे त्या अजूनही पत्र्याच्या शेडमध्येच राहतात. भीमराव झांजरे यांचे जुन्या माळीणमध्ये दुर्घटनेच्या दोन वर्षांआधी घर बांधून पूर्ण झाले होते. मात्र, घरांच्या नोंद घालणे बंद झाल्याने त्यांची नोंद झाली नाही. घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही. घराच्या घरपट्टया त्यांनी भरल्या. त्या पट्टया पण त्यांच्याकडे आहेत. तरीही नवीन गावात त्यांना घर मिळाल्याने नाही. घरासाठी आजही ते शासन दरबारी चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

चौकट

न्यायाची प्रतीक्षा

सगळं गाव नवीन गावठाणात रहायला गेले. मात्र, ही दोन्ही कुटुंबे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत पत्र्याच्या शेडमध्ये रहात आहेत. ही शेड मोडल्यानंतर दोन्ही कुटुंबे बेघर होणार आहेत. पत्र्याची शेड मोडण्यापूर्वी या दोन्ही कुटुंबांना घर मिळावे, अशी मागणी गोविंद झांजरे, शिवाजी लेंभे या ग्रामस्थांनी केली आहे.

माळीण गावचे पुनर्वसन होऊनही जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी कुटुंब.