शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:40 IST

सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात असून हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू

डिंभे : आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी जनतेची दिशाभूल सुरू आहे. जोपर्यंत राज्यघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत कोणतेही सरकार आदिवासींचे आरक्षण काढून घेऊ शकत नाही. असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील गाव भेट दौरा आणि विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे उपस्थित होते.

राज्यघटनेने आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण दिले आहे. सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जोपर्यंत राज्यघटना अस्तित्वात आहे, तोपर्यंत आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढून घेऊ शकत नाही. असे ठाम मत माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडले. आंबेगाव तालुक्यातील नानवडे (ता. आंबेगाव) येथे गाव भेट दौरा आणि विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले की, मी खासदार असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या भागातील अनेक रस्त्यांची कामे यशस्वीरीत्या राबवली. सध्या पुणे जिल्हा म्हाडाची सोडत निघाली आहे. यामध्ये आदिवासी लाभार्थ्यांसाठी काही घरे राखीव ठेवलेली असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करून म्हाडाच्या घरे मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने माळीण येथे बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील कमी मतदानाबाबत आपली खंत व्यक्त केली. मागील २५-३० वर्षांच्या कालावधीत या भागात केलेल्या कामांबाबत कोणी बोलत नाही, पण जी कामे झाली नाहीत त्या बाबतीत बोलून लोकांचा दिशाभूल करून डोकी फिरवण्याचे काम सुरू आहे. मतदारसंघातील विकासाचे काम पुढे नेण्यासाठी काही राजकीय धोरणे करावी लागली. हा निर्णय अनेक आमदारांनी एकत्रितपणे वरिष्ठ पातळीवर घेतला होता. विकासाच्या कामांसाठी आम्ही भाजपच्या सोबत असणे आवश्यक असल्याचे मत होते. त्यानंतर आम्ही सरकारमध्ये सामील झालो, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही भाजपमध्ये गेलो आहोत. शाहू, फुले, आंबेडकर, बिरसा मुंडा यांच्या विचारधारेला आम्ही कधीही सोडले नाही, असेही त्यांनी नमूद केले. इतकेच नाही, तर इको सेंसिटिव्ह झोनबाबत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आवाज उठवून एकही शेतकऱ्याची जमीन संपादनात जाऊ दिली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : No government can revoke reservation: Dilip Walse Patil.

Web Summary : Dilip Walse Patil asserts that no government can revoke reservations for tribal and other communities as long as the constitution exists. He highlighted development works and urged beneficiaries to apply for Mhada housing.
टॅग्स :PuneपुणेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलPoliticsराजकारणreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण