शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नीरादेवघर धरण : प्रकल्पबाधितांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:40 IST

निरादेवघर धरण पुर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवुन १५ वर्ष झाल्यानंतरही निरादेवघर प्रकल्पातील बाधित शेतक-यांच्या विविध मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने ३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी दिला आहे.

भोर : निरादेवघर धरण पुर्ण होऊन १०० टक्के पाणी अडवुन १५ वर्ष झाल्यानंतरही निरादेवघर प्रकल्पातील बाधित शेतक-यांच्या विविध मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेच्या वतीने ३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशपांडे व मार्गदर्शक हनुमंत शिरवले यांनी दिला आहे.महाराष्ट्र कृणा खोरे विकास संस्थेच्या वतीने निरादेवघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वरील इशारा देण्यात आला. यावेळी कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, हनुमंत शिरवले, प्रकाश साळेकर, ज्ञानोबा दिघे, संजय साने, राजु दिघे, बबन पोळ, अंकुश कंक, मारुती कंक, बाळासाहेब पावगे, धोंडीबा मालुसरे, लक्ष्मण दिघे उपस्थित होते.निरादेवघर धरणाच्या कामाला १९८४ साली मान्यता मिळाली होती. १९९३ साली धराणाच्या कामाला सुरवात झाली. २००० साली काम पुर्ण होऊन २००३ साली धरणात पाणी आडविण्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे ११.९२ टीएमसी क्षमतेचे धरण असून धरणात साळव दापकेघर, माझेरी, वेनुपुरी, धामुनशी, वारंवड, हिर्डोशी, प-हर खुर्द, प-हरबुदुक, शिरवली हि.मा, देवघर ११ गावे पुर्णत: बाधित झाली. तर रायरी, दुर्गाडी, अभेपुरी, कुडलीबु, कुडली खुर्द, देवघर, शिरगाव, निगुडघर, कोंढरी ८ गावे अंशत: बाधित असून धरणात सुमारे ४ हजार एकर जमिन पाण्यात गेली आहे. शेतक-यांची धरणात गेलेल्या खातेदारांची संकलन यादी १४५० खातेदारांची असून आत्तापर्यंत मागील १५ वर्षात फक्त ६०० खातेदारांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. ८५० खातेदारांचे पुनर्वसन अद्याप बाकी आहे. शिवाय ३९ किलोमीटरचा रिंगरोड आणि महाड-पंढरपूर रस्त्यासाठी धरणग्रस्तांच्या जमिनी गेल्या आहेत.बाधित गावे : निर्णयाची अंमलबजावणी कराबाधित गावांचे १०० टक्के पुर्नवसन करा, निरादेवघर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमिनी १०० टक्के पुर्नवसन होईपर्यंत इतरांना वाटप करु नये, १६ मे २००७ रोजीच्या तत्कालीन महसूल व पुनर्वसन मंत्री व रामराजे नाईक निंबाळक र यांच्या उपस्थितीत बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी करा.प्रकल्पग्रस्तांना शासन नोकऱ्या देऊ शकत नसल्याने १० लाख रुपये अनुदान द्यावे, प्रकल्पग्रस्त खातेदारांना वहिवाट अडथळे दुर करावेत, व वाटप केलेल्या जमिनीचे ताबे कब्जापटटी करण्यात यावे, लाभ त्रातील जमिनीला पाटाची व्यवस्था करावी, पुनर्वसित गावठाणातील १८ नागरी सुविधा तातडीने पुर्ण कराव्या.फलटण, खंडाळा तालुक्यातील एमआयडीत प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने नोक-या द्याव्यात या मागण्यासाठी धरणग्रस्त ३ एप्रिलला तहसिल कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणात असल्याचे कॉम्रेड ज्ञानोबा घोणे व ज्ञानेश्वर दिघे यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रती जिल्हधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार, पोलीस यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे