शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक शाळा आजपासून बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 13:49 IST

प्राथमिक शाळेसाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यास होत असलेल्या दिरंगाई व चालढकलीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी हा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशैक्षणिक दर्जा घसरला : ३३ लाखांचा निधी देऊनही कार्यवाही होत नसल्याने पालक संतप्तजिल्हा परिषदेच्या शाळा नं. १ मुलांची व २ मुलींची अशा दोन शाळा

नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळेसाठी मंजूर करण्यात आलेल्या तात्पुरत्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यास होत असलेल्या दिरंगाई व चालढकलीमुळे संतप्त झालेल्या पालकांनी उद्या (दि. १ ऑगस्ट) पासून आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात १७ जुलै रोजी व्यवस्थापन कमिटीने ठराव केला होता. त्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती यांना कळविण्यात आले होते. मात्र, यावर कोणताच तोडगा न निघाल्याने उद्यापासून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा नं. १ मुलांची व २ मुलींची अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळा एकाच इमारतीत भरत होत्या. मात्र, ही इमारत मोडकळीस आली असून व्यवस्थापन समितीने आपल्या जबाबदारीवर इथे शाळा भरवावी, असा अहवाल कार्यकारी अभियंत्याने गेल्या वर्षी दिला. त्यानंतर तात्पुरती सोय म्हणून दोन महिन्यांसाठी ही शाळा नीरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीत विभागून बसवण्यात आली होती. मे महिन्यात यावर उपाययोजना करून नवीन इमारत होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात इराकॉन पॅनलच्या वर्गखोल्या बांधण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिले होते. त्यानुसार ३३ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात निविदा प्रसिद्ध होऊन कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. मात्र, ऐन वेळी रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या आवारात तात्पुरत्या वर्गखोल्या बांधण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बाजारतळावर बांधकामाला परवानगी मिळावी म्हणून पालकांनी मागणी केली. मात्र, ग्रामपंचायतीने त्याला नकार दिला. एका खासगी व्यक्तीने दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर शेतजमीन देण्याचा प्रस्ताव दिला; मात्र जिल्हा परिषदेने तो नाकारल्याने जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे येथील शाळा नं. १च्या दुसरी व चौथीच्या मुलांना रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तर, शाळा नं. २च्या तिसरी ब व क तुकडीच्या मुलींना कन्या विद्यालयाच्या प्रयोगशाळेत दाटीवाटीने बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. बाकी विद्यार्थ्यांची अवस्थाही काही प्रमाणात तशीच आहे. रयतने साडेसात ते साडेबारापर्यंत वर्गखोल्या वापरण्याची परवानगी दिली असली, तरी माध्यमिकची मुले लवकर येत असल्याने मुलांना ११ वाजताच वर्गातून बाहेर यावे लागते. त्यामुळे मुलांना अपेक्षित वेळ मिळत नाही. यामुळे शैक्षणिक दर्जा घसरू लागला आहे. .......ती इमारत रयतलाच हवीयजिल्हा परिषदेने रयतकडे त्यांच्या आवारात  तात्पुरत्या इराकॉन पॅनलच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, रयतने त्या वर्गखोल्या तुमची गरज संपल्यानंतर आम्हाला सोडून जाणार असाल तर परवानगी देऊ, अशी अट घातल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याने व पुढे गरज भासेल त्या ठिकाणी या खोल्या नेण्यात येणार असल्याचे प्रयोजन असल्याने तसे करता येणार नाही, असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनीही रयतशी संपर्क साधला असता रयतच्या नीरा येथील स्थानिक स्कूल कमिटीनेच तसा प्रस्ताव दिला असल्याची माहिती रयतच्या सचिवांनी दिली आहे. ..........ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका दरम्यान, नीरा ग्रामपंचायतीने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. पालक मुलांच्या बैठकव्यवस्थेबद्दल सांगत असताना काही सदस्य मात्र पुन्हा जुन्या इमारतीत शाळा भरवण्याचा सल्ला पालकांना देत आहेत. नीरा ग्रामपंचायतीमध्ये दोन गटांची सत्ता आहे.   या दोन्ही गटांतील नेते पालकांना ‘आम्ही तुमच्याबरोबर असल्याचे’ सांगतात. मात्र, कोणताही तोडगा काढण्यास ते पुढे येत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांबाद्दल नाराजी पसरली आहे..........शिक्षणाबाबत रयत शिक्षण संस्थेचे व्यावसायिक धोरण?रयत संकुलात वापरात नसलेली मोठी जागा असताना रयतचे पदाधिकारी मुलांच्या शिक्षणासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देतानाही आपल्या मोठ्या फायद्याचा विचार करताना दिसतायत आणि त्यातूनच रयतचे शिक्षणाचे धोरण व्यावसायिक झालेय का? असा सवाल उपस्थित होतो. नीरा येथे रयतच्या संकुलात आसपासच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी पाचवीपासून पुढे शिक्षण घेत आहेत. या भागातील प्राथमिक शाळा बंद पडून लोकांनी मुलांना इग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले, तर त्याचा फटका पुढील काळात रयतलाही बसेल.

टॅग्स :PurandarपुरंदरSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण