शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पुणे जिल्ह्यात पिकतोय हार्ट अटॅक पासून वाचवणारा 'निळाकाळा भात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 16:34 IST

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यंदा आसाम आणि इंडोनेशियातून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड तालुक्याच्या आदिवासी भागात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पहिलाच प्रयोग निळसर काळ्या रंगाच्या भात लोंब्या शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यंदा आसाम आणि इंडोनेशियातून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड तालुक्याच्या आदिवासी भागात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. सध्या या भातपिकाच्या लोंब्या लगडल्या आहेत. निळसर काळ्या रंगाच्या भात लोंब्या शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. कृषी विभागाच्या पुढाकाराने या भाताची लागवड करण्यात आली असून, या प्रकारचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे.

निळ्या भातामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि अँथोसायनिन असतात. सध्या निळ्या तांदळाविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. निळा तांदूळ पांढऱ्या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. निळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. याशिवाय निळा तांदूळ बऱ्याच रोगांवरही फायदेशीर ठरतो, तसेच त्यामध्ये अँन्थोसायनिन असल्याने हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. एवढेच नव्हे, तर ते आपल्याला हार्ट अटॅकपासून देखील वाचवते.

निळ्या भाताची लागवड भारतात फारच कमी प्रमाणात केली जाते. भारतीय बाजारपेठेत निळ्या तांदळाचा भाव २५० रुपये प्रतिकिलोपासून सुरू होतो. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात शेतकऱ्यांनी २० गुंठे क्षेत्रात या निळ्या भाताची लागवड केली आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या ओंब्या आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. संपूर्ण शेत काळ्या ओंब्यांनी बहरले आहे. निळ्या भाताचे उत्पादन ११० दिवसांत घेतले जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य होणार आहे. शेतातील धानाच्या लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास फुलवडे येथील माजी पोलीस पाटील, तसेच पुणे जिल्ह्यातून भात शेतीत प्रथम क्रमांक मिळविलेले प्रगतशील शेतकरी गंगाराम लिंबाजी हिले यांनी व्यक्त केला.

कॅन्सरसह विविध आजारांसाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले

निळा तांदूळ वजन कमी करण्यात खूप उपयुक्त आहे. कारण पांढऱ्या तांदळापेक्षा यात चरबी कमी आहे. निळ्या भातामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट यकृत निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हे यकृतातील हानिकारक पदार्थांचे डिटॉक्स करते. निळ्या भातामध्ये सापडलेला अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करतो. १०० ग्रॅम निळ्या भातामध्ये साधारणपणे ४:५ ग्रॅम फायबर असते जे आपले पचन अधिक चांगले राखण्यास मदत करते. याशिवाय ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारांसाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावPuneपुणेFarmerशेतकरीWaterपाणी