शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
2
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
3
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
4
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
5
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
6
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
8
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
9
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
10
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
11
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
12
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
13
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
14
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
15
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
16
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
17
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
18
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
19
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
20
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू

ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: January 30, 2025 18:16 IST

देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असंच ते करतात

पुणे: केंद्र सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांना देशातील हिंदुची किंवा मुस्लिमांचीही चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्ता कशी राहील याचीच चिंता आहे अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. सत्तेसाठी ते संविधानही बदलतील असे सांगत ते सोयीने सगळे नियम बदलत चालले आहेत असे सावंत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालगंधर्व कलादालनातील व्यंगचित्र प्रदर्शनाला सावंत यांनी गुरूवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकार सगळे नियम बदलत चालले आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश करतील असा नियम होता. त्यांनी सरन्यायाधिशांना काढून टाकले. तिथे पंतप्रधान सुचवतील ते मंत्री असा बदल केला. आता आयुक्तांची निवड कायमच दोन विरूद्ध एक अशा मतांनी होईल.

वक्फ बोर्डाचा तब्बल ६९५ पानांचा अहवाल त्यांनी सायंकाळी सव्वासहा वाजता पाठवला. त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता बोर्डाची बैठक आहे, त्यात तुमचे म्हणणे मांडा असे कळवण्यात आले. ६०५ पानांचा अहवाल वाचणार कधी व त्यावर म्हणणे तयार करणार कधी? पण याचा विचार ते करत नाहीत. सगळे आधीच ठरलेले असते, त्याप्रमाणेच त्यांना करायचे असते. बोर्डमध्ये बहुमताने ज्या सुधारणा झाल्या, त्या अशा करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे असे सावंत म्हणाले.

देशात हिंदु विरूद्ध मुस्लिम कसे होईल हेच ते पहात असतात असा आरोप सावंत यांनी केला. देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, मात्र त्यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असे ते करतात. याचा अर्थ त्यांना हिंदुंची किंवा मुस्लिमांची काळजी आहे असा नाही तर सत्ता कशी टिकवता येईल याची चिंता आहे. त्यांचे जे काही सुरू असते ते सगळे सत्ता कशी मिळेल यासाठीच अशी टीका सावंत यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकारHinduहिंदूMuslimमुस्लीमShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती