शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

ना हिंदुंची ना मुस्लिमांची, राज्यकर्त्यांना फक्त सत्तेची चिंता; अरविंद सावंतांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: January 30, 2025 18:16 IST

देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असंच ते करतात

पुणे: केंद्र सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांना देशातील हिंदुची किंवा मुस्लिमांचीही चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्ता कशी राहील याचीच चिंता आहे अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. सत्तेसाठी ते संविधानही बदलतील असे सांगत ते सोयीने सगळे नियम बदलत चालले आहेत असे सावंत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालगंधर्व कलादालनातील व्यंगचित्र प्रदर्शनाला सावंत यांनी गुरूवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकार सगळे नियम बदलत चालले आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश करतील असा नियम होता. त्यांनी सरन्यायाधिशांना काढून टाकले. तिथे पंतप्रधान सुचवतील ते मंत्री असा बदल केला. आता आयुक्तांची निवड कायमच दोन विरूद्ध एक अशा मतांनी होईल.

वक्फ बोर्डाचा तब्बल ६९५ पानांचा अहवाल त्यांनी सायंकाळी सव्वासहा वाजता पाठवला. त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता बोर्डाची बैठक आहे, त्यात तुमचे म्हणणे मांडा असे कळवण्यात आले. ६०५ पानांचा अहवाल वाचणार कधी व त्यावर म्हणणे तयार करणार कधी? पण याचा विचार ते करत नाहीत. सगळे आधीच ठरलेले असते, त्याप्रमाणेच त्यांना करायचे असते. बोर्डमध्ये बहुमताने ज्या सुधारणा झाल्या, त्या अशा करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे असे सावंत म्हणाले.

देशात हिंदु विरूद्ध मुस्लिम कसे होईल हेच ते पहात असतात असा आरोप सावंत यांनी केला. देशात शेतकऱ्यांना हमीभाव, कोसळणारा रुपया, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न आहेत, मात्र त्यावरून लक्ष वळवायचे तर हिंदु मुस्लिम करायचे असे ते करतात. याचा अर्थ त्यांना हिंदुंची किंवा मुस्लिमांची काळजी आहे असा नाही तर सत्ता कशी टिकवता येईल याची चिंता आहे. त्यांचे जे काही सुरू असते ते सगळे सत्ता कशी मिळेल यासाठीच अशी टीका सावंत यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेArvind Sawantअरविंद सावंतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCentral Governmentकेंद्र सरकारHinduहिंदूMuslimमुस्लीमShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती