शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

घाट दुरुस्तीकडे झाले दुर्लक्ष

By admin | Updated: May 18, 2015 05:40 IST

येथील मुख्य मंदिराच्या मागील इंद्रायणी नदीचा घाट नऊ महिने उलटून गेले, तरी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, याची जबाबदारीही कोणी

देहूगाव : येथील मुख्य मंदिराच्या मागील इंद्रायणी नदीचा घाट नऊ महिने उलटून गेले, तरी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, याची जबाबदारीही कोणी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी देहूगाव येथे देहू-आळंदी विकास समितीच्या माध्यमातून तीरावर घडीव दगडांचा घाट बांधण्यात आला. त्यानंतर गावात चार वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार विकासकामांना सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीही शासनाच्या वतीने काही कामे झाली. समितीने प्रवेशद्वार आणि घाट बांधून गावाच्या सौंदर्यात वाढ करण्यास सुरुवात केली. सध्या विकास आखड्यानुसार पित्ती धर्मशाळेपासून गोपाळपूरदरम्यान घाट बांधण्याचे काम सुरू झाले. सध्या घाटाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने इंद्रायणीतीरास आगळे सौंदर्य प्राप्त होत आहे. मात्र, मुख्य देऊळवाड्यामागील घाट कोसळल्यानंतर दुरुस्ती न झाल्याने तेथे उलट चित्र दिसत आहे. अवघ्या सात-आठ वर्षांपूर्वी पूर्ण झालेले घाटाचे दगडी काम गतवर्षीच्या पावसाळ्यात कोसळले. संस्थानच्या वतीने घाटाच्या वरील भागात मंदिरातील दगडी टाकण्यात आल्या होत्या. पावसात पाणी जमिनीत मुरले व येथील भराव खचून हा घाट कोसळला, असे बोलले जाते. सलग भिंत खूपच उंच बांधण्यात आली असल्याने दगड व पाणी यांचा दबाव या घाटाच्या भिंतीवर पडल्याने हा घाट पडला असावा, असे काही लोक म्हणतात. काही नागरिक या घाटाचे बांधकाम निकृष्ट झाल्याने पडला असल्याची चर्चा आहे.(वार्ताहर)