शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वाङ्यीन पत्रव्यवहाराच्या अभ्यासाकडे समीक्षेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST

पुणे : पाश्चात्य जगात पत्रव्यवहाराला विलक्षण महत्त्व आहे. लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे अनोखे दर्शन पत्रव्यवहारातून घडत असते. ...

पुणे : पाश्चात्य जगात पत्रव्यवहाराला विलक्षण महत्त्व आहे. लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे अनोखे दर्शन पत्रव्यवहारातून घडत असते. पत्रव्यवहारासंदर्भातल्या अभ्यासाकडे मराठी साहित्य समीक्षेने दुर्लक्ष केले, अशी खंत ज्येष्ठ लेखिका आणि भाषा अभ्यासक डॉ. अंजली सोमण यांनी व्यक्त केली.

डॉ. सोमण यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी, पराग जोगळेकर आणि उज्ज्वला जोगळेकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. सोमण म्हणाल्या, 'गं. बा. सरदार यांनी मला साहित्याच्या सामाजिक अभ्यासाची गरज लक्षात आणून दिली. समाजाशी जिवंत संबंध असावा म्हणून मी स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, युक्रांद अशा चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मला समकालीन प्रश्नांचे भान आले. माझे सर्जनशील तसेच समीक्षालेखन साहित्याचा सामाजिक अंगाने विचार करणारेच आहे.

कोत्तापल्ले म्हणाले, 'पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या लेखनाकडे दुर्लक्ष झाले. कलावंतांनी अपेक्षा न ठेवता निर्मिती करावी. ज्ञानाला सामोरे जाण्याची वृत्ती कमी होत चालली आहे.'

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘संस्थात्मक कार्याकडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन आणि साहित्य क्षेत्रांतील प्रतिसादशून्यता चिंताजनक आहे. डॉ. जोगळेकर यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला.'

प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.