शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनिल महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:33 IST

२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ 

ठळक मुद्देपाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैववैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरजवेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नाशिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित

पुणे : ‘भुसावळ जवळील हतनूरच्या धरणाच्या पाणथळ क्षेत्रात २५ हजारांहून अधिक पक्षी, २८० प्रजाती सापडतात. त्यामुळे पाणथळ जागांसाठी जागतिक  पातळीवरचा ‘रामसर साईट’ चा दर्जा मिळवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच, हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरज आहे’, असे मत पक्षी निरीक्षक अनिल महाजन यांनी व्यक्त केले. हतनूरप्रमाणे उजनी येथेही पक्षी वैविध्य आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे तेथेही पक्षी अभयारण्य घोषित होऊ शकले नाही, अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली .  जीविधा, देवराई फाऊंडेशन, निसर्गसेवक या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे झालेल्या व्याख्यानात महाजन बोलत होते. अनिल महाजन आणि त्यांचे सहकारी राणा राजपूत यांचा उष:प्रभा पागे, डॉ. विनया घाटे, धनंजय शेडबाळे, राजीव पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाजन म्हणाले, ‘१९८० च्या दशकापासून हतनूर धरणाच्या परिसरात तापी, पूर्णा नद्यांच्या संगमामुळे पाणथळ क्षेत्र तयार झाले. परदेशातूनही येथे ‘रेड फलरोप’ सारखे दुर्मिळ स्थलांतरित पक्षी येऊ लागले. येथे २८० प्रकारचे पक्षी दिसू लागले. २०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ हतनूरचे जैववैविध्य राखण्यासाठी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य होणे आवश्यक आहे. अभयारण्य झाले की येणाऱ्या संभाव्य बंधनांना स्थानिकांचा विरोध आहे. राजकारण्यांची अनास्था आहे. इराणच्या ‘रामसर’ पाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैववैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा दिला जातो. तसा दर्जा हतनूरला मिळण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने प्रस्ताव करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत जनजागृती होणे गरजेचे आहे.जायकवाडी, वेंगुर्ला रॉक, मेहुल शिवडी, नांदूर मध्यमेश्वर (नाशिक ), ठाणे क्रिक, लोणार ही पाणथळे संरक्षित आहेत. मात्र, नवेगाव, उजनी, हतनूरसारखी पाणथळे अजून संरक्षित होऊ शकली नाहीत, असेही ते म्हणाले. राजीव पंडीत यांनी प्रास्तविक केले. धनंजय शेडबाळे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यforestजंगलWaterपाणी