शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्ससारखी साहित्यनिर्मिती काळाची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:29 IST

इतिहास हा कथा- दंतकथांमधून समाजापुढे जात असतो.

ठळक मुद्देरहस्य कादंबरीचा प्रकाशन सोहळा 

पुणे : वाचकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पाश्चात्त्यांसारखी नवीन विश्वाची निर्मिती करणारी मिथके  काळाची गरज आहे. कारण, इतिहास हा कथा- दंतकथांमधून समाजापुढे जात असतो. हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स ही पाश्चात्त्यांची मिथकेच आहेत. अशा पद्धतीचे कथानक ‘रहस्य’ कादंबरीतून मांडले गेले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांनी व्यक्त  केले.विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे गणेश महादेवलिखित ‘रहस्य’ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी व घनश्याम पाटील उपस्थित होते. विश्वकर्मा प्रकाशनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणी, सहसंपादक संदीप तापकीर हे उपस्थित होते.वसंत वसंत लिमये म्हणाले, ‘‘प्रत्येक काळामध्ये समाजमनाला मिथकांची गरज असते. ताकदवान मिथके सांस्कृतिक जडणघडण करीत असतात. सध्याच्या भारतीय समाजाची ही गरज मिथकप्रधान साहित्यातून भागू शकते. ‘रहस्य’ कादंबरीने याकरिता महत्त्वाचे योगदान दिले आहे.’’

संजय सोनवणी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये सातवाहनकालीन राजांनी अनेक किल्ले बांधले. अशा प्राचीन वातावरणात कादंबरी वाचकाला घेऊन जाते. त्याचबरोबर वाचकाला अनेक मिथ्यांमध्ये घेऊन जाण्याचे कसब या कादंबरीत आहे.’’घनश्याम पाटील यांनी रहस्य कादंबरीचे मर्म उलगडले. ते म्हणाले, ‘‘रहस्य कादंबरी वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. यातली मानवी पात्रेच नाही, तर जनावरेदेखील आपला ठसा उमटवून जातात. त्यामुळे कादंबरीतील जंगल, जनावरे, माणसे ही हजार तोंडांनी वाचकाशी बोलतात व एका वेगळ्याच दुनियेत वाचकाला घेऊन जातात.’’लेखक गणेश महादेव यांनीही कादंबरीलेखनामागची भूमिका स्पष्ट केली. गुप्तधनासारखा विषय कादंबरीत जरी मांडला असला, तरीदेखील कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांपासून वेगळा शुद्ध आध्यात्मिक विचार या कादंबरीतून मांडल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात कादंबरीवाचनाने झाली. योगेश काळजे, संतोष घुले, उमेश बागडे यांनी कादंबरीवाचन केले. प्रा. प्रदीप तामखडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.०००

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य