शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्ससारखी साहित्यनिर्मिती काळाची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:29 IST

इतिहास हा कथा- दंतकथांमधून समाजापुढे जात असतो.

ठळक मुद्देरहस्य कादंबरीचा प्रकाशन सोहळा 

पुणे : वाचकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी पाश्चात्त्यांसारखी नवीन विश्वाची निर्मिती करणारी मिथके  काळाची गरज आहे. कारण, इतिहास हा कथा- दंतकथांमधून समाजापुढे जात असतो. हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स ही पाश्चात्त्यांची मिथकेच आहेत. अशा पद्धतीचे कथानक ‘रहस्य’ कादंबरीतून मांडले गेले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक वसंत वसंत लिमये यांनी व्यक्त  केले.विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे गणेश महादेवलिखित ‘रहस्य’ कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी व घनश्याम पाटील उपस्थित होते. विश्वकर्मा प्रकाशनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणी, सहसंपादक संदीप तापकीर हे उपस्थित होते.वसंत वसंत लिमये म्हणाले, ‘‘प्रत्येक काळामध्ये समाजमनाला मिथकांची गरज असते. ताकदवान मिथके सांस्कृतिक जडणघडण करीत असतात. सध्याच्या भारतीय समाजाची ही गरज मिथकप्रधान साहित्यातून भागू शकते. ‘रहस्य’ कादंबरीने याकरिता महत्त्वाचे योगदान दिले आहे.’’

संजय सोनवणी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये सातवाहनकालीन राजांनी अनेक किल्ले बांधले. अशा प्राचीन वातावरणात कादंबरी वाचकाला घेऊन जाते. त्याचबरोबर वाचकाला अनेक मिथ्यांमध्ये घेऊन जाण्याचे कसब या कादंबरीत आहे.’’घनश्याम पाटील यांनी रहस्य कादंबरीचे मर्म उलगडले. ते म्हणाले, ‘‘रहस्य कादंबरी वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. यातली मानवी पात्रेच नाही, तर जनावरेदेखील आपला ठसा उमटवून जातात. त्यामुळे कादंबरीतील जंगल, जनावरे, माणसे ही हजार तोंडांनी वाचकाशी बोलतात व एका वेगळ्याच दुनियेत वाचकाला घेऊन जातात.’’लेखक गणेश महादेव यांनीही कादंबरीलेखनामागची भूमिका स्पष्ट केली. गुप्तधनासारखा विषय कादंबरीत जरी मांडला असला, तरीदेखील कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांपासून वेगळा शुद्ध आध्यात्मिक विचार या कादंबरीतून मांडल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात कादंबरीवाचनाने झाली. योगेश काळजे, संतोष घुले, उमेश बागडे यांनी कादंबरीवाचन केले. प्रा. प्रदीप तामखडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.०००

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य