शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वारसा हक्काचा संभ्रम दूर होण्याची गरज - आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:54 IST

डॉ. सुधाकर आव्हाड: बारामती येथील व्याख्यानात मार्गदर्शन

बारामती : मागील काही महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या मुलींच्या वारसा हक्काबाबत संभ्रम निर्माण करणारे निकाल आले आहेत. एकसारख्या खंडपीठाने हे परस्परविरोधी निर्णय दिल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. जास्तीच्या खंडपीठाकडून याबाबतची संदिग्धता दूर होण्याची गरज असल्याचे मत बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांनी बारामती येथे व्यक्त केले.

बारामती वकील संघटनेने दिवाणी कायद्याविषयीची माहिती, मुलींचा वारसाहक्क कायदा बदल, औद्योगिक प्रदूषण कायदे इत्यादीबाबत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी अ‍ॅड. आव्हाड बोलत होते. वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय शिपकुले, उपाध्यक्ष अ‍ॅड. स्वाती गिरंजे, सचिव अ‍ॅड. योगेश राऊत, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. प्रीती पांढरे,अ‍ॅड. चेतन नांगरे आदींसह वकील संघटनेचे सदस्य व वकीलवर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता. अ‍ॅड. आव्हाड म्हणाले की, ‘‘सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका खटल्यात मुलीचा वारसाीक्क मान्य केला ; मात्र सहहिस्सेदार म्हणून हक्क नाकारला. हक्क आईवडिलांच्या मृत्यूनंतर मिळेल असे सांगितले. मात्र दुसऱ्या खटल्यात जन्मत:च मुलगी सहहिस्सेदार राहिल असे सांगितले. हा विरोधाभास आहे. यांनी कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण भयानक असून, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी आपल्या युक्तिवादाची दखल घेऊन निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली, ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. अरविंद आव्हाड या तरुण वकिलाच्या युक्तिवादाची दखल घेऊन दिवाणी कायद्यातील कलम ९ अ राज्यपालाच्या वटहुकूमाद्वारे रद्द झाला ही अभिमानाची बाब असून, तरुण वकिलांनी अभ्यासपूर्ण खटले चालवल्यास सकारात्मक बदल निश्चित होतील ’’. सूत्रसंचालन अ‍ॅड. योगेश राऊत यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रीती पांढरे यांनी मानले.विरोधाभास दूर होण्याची गरज१९ एप्रिल २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी टी. बी. राजू व इतर विरुद्धच्या खटल्यात मुलीचा वारसाहक्क मान्य केला; मात्र सहहिस्सेदार म्हणून हक्क नाकारला व अपील अंशत: मान्य केले व तो हक्क आईवडिलांच्या मृत्यूनंतर मिळेल असे सांगितले. दुसरीकडे १ फेब्रुवारी २०१८ दानम्मा विरुद्ध अमर या खटल्यात दोनच न्यायाधीशांनी जन्मत: च मुलगी सहहिस्सेदार आहे असे ठरवले होते त्यामुळे दोन्ही निकाल समान संख्येच्या खंडपीठाने दिले असून हा विरोधाभास दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीच्या खंडपीठाने याबाबत निर्णय देणे गरजेचे असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती