शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

शिक्षणाचा ‘क्लास’ बदलायला हवा : अनिल काकोडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:40 IST

शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे.

ठळक मुद्देपरीक्षेभोवती घुटमळणाऱ्या शिक्षणपद्धतीची पुनर्रचना गरजेची विषय, शिक्षक आणि शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरुन त्याला शिक्षण देण्याची गरज

पुणे : देशातील खासगी शिकवणी (कोचिंग क्लास) उद्योगाचा व्याप हा तब्बल ४.२ लाख कोटींच्या आसपास आहे. जवळपास तितकीच रक्कम सरकार देखील खर्च करते. इतका पैसा खर्च करुनही आपण केवळ परीक्षा आणि पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच शिकत आहोत. केवळ माहिती देण्याचे काम सध्याच्या शिक्षणपद्धतीतून होत आहे. शिक्षणातून ज्ञान देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित १४४व्या वसंत व्याख्यान मालेचे पहिले पुष्प डॉ. काकोडकर यांनी गुंफले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टिळक स्मारक मंदिरात २० मे पर्यंत व्याख्यानमाला चालणार आहे.   डॉ. काकोडकर म्हणाले, शिक्षण पद्धतीने नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करुन घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरुन त्याला शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून, सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे. ज्ञानाचा उपयोग कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात नाही. येत्या काही दशकात शाळेत जाऊन शिकविण्याची पद्धत कालबाह्य होईल. त्यामुळे पुढील पंचवीस वर्षांचा काळ लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल केले पाहिजेत. उलट खुल्या शिक्षणपद्धतीचा स्वीकार करुन विषय, शिक्षक आणि शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी, असे बदल झाल्यास चांगल्या शिक्षण संस्थाच केवळ टिकतील, असे डॉ. काकोडकर म्हणाले.  देशातील जवळपास ६० ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. मात्र, शिक्षणसंस्था शहरी भागातच स्थापन्याची मानसिकता आहे. अधिक खर्च झाला तरी चालेल, मात्र ग्रामीण भागात विद्यापीठे उभारणे आवश्यक आहे. तेथे देखील उद्योग उभे राहू शकतात. ग्रामीण भागातील उद्योग म्हणजे शेतीपुरक अथवा प्रक्रिया उद्योग असाच विचार केला जातो. ही मानसिकता देखील बदलली पाहीजे. उलट शहरा इतकाच पैसा ग्रामीण भागात मिळविता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी