शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा ‘क्लास’ बदलायला हवा : अनिल काकोडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:40 IST

शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे.

ठळक मुद्देपरीक्षेभोवती घुटमळणाऱ्या शिक्षणपद्धतीची पुनर्रचना गरजेची विषय, शिक्षक आणि शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरुन त्याला शिक्षण देण्याची गरज

पुणे : देशातील खासगी शिकवणी (कोचिंग क्लास) उद्योगाचा व्याप हा तब्बल ४.२ लाख कोटींच्या आसपास आहे. जवळपास तितकीच रक्कम सरकार देखील खर्च करते. इतका पैसा खर्च करुनही आपण केवळ परीक्षा आणि पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठीच शिकत आहोत. केवळ माहिती देण्याचे काम सध्याच्या शिक्षणपद्धतीतून होत आहे. शिक्षणातून ज्ञान देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित १४४व्या वसंत व्याख्यान मालेचे पहिले पुष्प डॉ. काकोडकर यांनी गुंफले. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. टिळक स्मारक मंदिरात २० मे पर्यंत व्याख्यानमाला चालणार आहे.   डॉ. काकोडकर म्हणाले, शिक्षण पद्धतीने नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करुन घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, हे हेरुन त्याला शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून, सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे. ज्ञानाचा उपयोग कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जात नाही. येत्या काही दशकात शाळेत जाऊन शिकविण्याची पद्धत कालबाह्य होईल. त्यामुळे पुढील पंचवीस वर्षांचा काळ लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल केले पाहिजेत. उलट खुल्या शिक्षणपद्धतीचा स्वीकार करुन विषय, शिक्षक आणि शिक्षणसंस्था निवडण्याची विद्यार्थ्याला मुभा हवी, असे बदल झाल्यास चांगल्या शिक्षण संस्थाच केवळ टिकतील, असे डॉ. काकोडकर म्हणाले.  देशातील जवळपास ६० ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. मात्र, शिक्षणसंस्था शहरी भागातच स्थापन्याची मानसिकता आहे. अधिक खर्च झाला तरी चालेल, मात्र ग्रामीण भागात विद्यापीठे उभारणे आवश्यक आहे. तेथे देखील उद्योग उभे राहू शकतात. ग्रामीण भागातील उद्योग म्हणजे शेतीपुरक अथवा प्रक्रिया उद्योग असाच विचार केला जातो. ही मानसिकता देखील बदलली पाहीजे. उलट शहरा इतकाच पैसा ग्रामीण भागात मिळविता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी