शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

शालेय जीवनापासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजणे गरजेचे : डॉ. नारळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 3:50 AM

मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ​​​​​​​

पुणे : शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान हा विषय शिकवताना केवळ पुस्तकांवर अवलंबून न राहता त्यातील मर्म विद्यार्थ्यांना समजावून सांगायला हवे. मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने जनता वसाहत येथील प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीतील विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसोबत पुणे विद्यापीठ येथील आयुका या विज्ञान शोधिकेमध्ये डॉ. जयंत नारळीकर, मंगला नारळीकर यांनी संवाद साधताना विज्ञानातील गमती जमती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, अवकाश विज्ञान या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेतील जंगलात झिम्बाब्वे या देशात गेलो असताना सूर्यग्रहणामुळे अंधार पडला. रात्र झाली असे समजून त्या जंगलातील पाणघोडे आम्हाला खाण्याकरिता अंगावर धावून आले. मात्र थोड्याच वेळात ग्रहण संपले व सूर्यप्रकाश पडला. त्यामुळे ते पाणघोडे परत निघून गेले. अशाप्रकारे सूर्यग्रहणाने आमचा जीव वाचला. डॉ.नारळीकरांनी हा प्रसंग वर्णन करताना सर्व विद्यार्थी चकित झाले होते.

टॅग्स :scienceविज्ञानJayant Narlikarजयंत नारळीकरtechnologyतंत्रज्ञानStudentविद्यार्थीSchoolशाळा