शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

राष्ट्रवादी काँग्रेसला उरली नाही उद्धव ठाकरेंची गरज - शंभूराज देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 08:41 IST

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही ते म्हणाले...

पुणे :शरद पवार, अजित पवार यांची अदानीसंदर्भातील आणि इतर वक्तव्ये पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला आता उद्धव ठाकरे यांची गरज उरलेली दिसत नाही, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही ४० जण एकत्रच आहाेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही ते म्हणाले.

रात्री उशिरा पुण्यात आलेल्या देसाई यांनी पत्रकारांशी बाेलताना ही टीका केली. सत्ता हवी म्हणून पवारांनी उद्धव ठाकरे यांना जवळ केले, आता त्यांची ती गरज संपली आहे. त्यामुळेच शरद पवार अदानींबाबतची चौकशी नको म्हणतात, अजित पवारांना मोदींची डिग्री नको वाटते. बाळासाहेब सत्तेचा रिमोट स्वतःजवळ ठेवायचे. उद्धव यांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी रिमाेट शरद पवारांकडे दिला, अशी टीकादेखील देसाई यांनी केली.

निवडणुकीतील जागावाटपाची सगळी जबाबदारी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यांच्यात काही मतभेद नाहीत व आम्हा ४० जणांमध्येही काही मतभेद नाहीत. अयोध्येचा दौरा आम्ही श्रद्धेने केला. भाजप बरोबर होतेच. दोघांचेही झेंडे लखनौपासून एकत्रच होते. घट्ट आहोत. सर्वच देवदेवतांचे दर्शन आम्ही घेतो, त्यात काही विशेष नाही. हिंदुत्वासाठी शिवसेना व भाजपची युती आहे. कायद्यानेच आता आमची शिवसेनाच खरी असल्याचे सिद्ध झाले आहे. आयोगाने सर्व अभ्यास करूनच आम्हाला चिन्ह दिले. सर्वोच्च न्यायालयानेही या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला, असेही देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShambhuraj Desaiशंभूराज देसाईNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे