शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

"लखीमपूऱच्या ताज्या घटनेवर मोदींनी भाष्य करावे", पुण्यातून काँगेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:53 IST

केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक अशी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटलांची टीका

ठळक मुद्देसमाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे

पुणे: उत्तरप्रदेशात लखीमपूरमध्ये मारले गेलेले शेतकरी आंदोलनांमधीलच होते. पंतप्रधान मोदी यांनी आता तरी मौन सोडून भाष्य करावे अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेसभवनमध्ये मंगळवारी दुपारी पाटील यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी म्हणून निघाल्या. उत्तरप्रदेश सरकारने त्यांना ताब्यात घेतले, या घटनेचा काँग्रस निषेध करत आहे. वर्ष होत आले शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानीत आंदोलन करत आहेत व मोदी त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. लखीमपूऱच्या ताज्या घटनेत एकदोन नाही तर आठ शेतकरी प्राणाला मुकले आहेत, किमान त्यावर तरी पंतप्रधान म्हणून मोदी यांनी बोलावे अशी आमची मागणी आहे.

''केंद्र सरकार विदेशी कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालत आहेत. त्यांची आर्थिक धोरणे देशाला मारक होत आहेत. समाजाचा एकही घटक समाधानी नाही. देशातील मध्यमवर्गाची मोदी फसवणूक करत आहेत असा आरोप पाटील यांनी केला.''

''काँग्रेसनेच नेहमीच जबाबदारीने कारभार केला. मोदी यांच्या सरकारमध्ये जबाबदारीच दिसत नाही अशी टीका पाटील यांनी केली. महाराष्ट्र काँग्रेस चांगले काम करत आहे, समाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे असा दावा पाटील यांनी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पटोले यांच्या हस्ते पाटील यांचे स्वागत केले.''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी