शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

"लखीमपूऱच्या ताज्या घटनेवर मोदींनी भाष्य करावे", पुण्यातून काँगेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:53 IST

केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक अशी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटलांची टीका

ठळक मुद्देसमाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे

पुणे: उत्तरप्रदेशात लखीमपूरमध्ये मारले गेलेले शेतकरी आंदोलनांमधीलच होते. पंतप्रधान मोदी यांनी आता तरी मौन सोडून भाष्य करावे अशी मागणी काँग्रेस करत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारची सर्व धोरणे देशविघातक असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेसभवनमध्ये मंगळवारी दुपारी पाटील यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व अन्य प्रदेश पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी शेतकऱ्यांच्या सांत्वनासाठी म्हणून निघाल्या. उत्तरप्रदेश सरकारने त्यांना ताब्यात घेतले, या घटनेचा काँग्रस निषेध करत आहे. वर्ष होत आले शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानीत आंदोलन करत आहेत व मोदी त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. लखीमपूऱच्या ताज्या घटनेत एकदोन नाही तर आठ शेतकरी प्राणाला मुकले आहेत, किमान त्यावर तरी पंतप्रधान म्हणून मोदी यांनी बोलावे अशी आमची मागणी आहे.

''केंद्र सरकार विदेशी कंपन्यांसाठी भारतात पायघड्या घालत आहेत. त्यांची आर्थिक धोरणे देशाला मारक होत आहेत. समाजाचा एकही घटक समाधानी नाही. देशातील मध्यमवर्गाची मोदी फसवणूक करत आहेत असा आरोप पाटील यांनी केला.''

''काँग्रेसनेच नेहमीच जबाबदारीने कारभार केला. मोदी यांच्या सरकारमध्ये जबाबदारीच दिसत नाही अशी टीका पाटील यांनी केली. महाराष्ट्र काँग्रेस चांगले काम करत आहे, समाजातील बुद्धींवत वर्ग आता काँग्रेसकडे झूकू लागला आहे असा दावा पाटील यांनी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पटोले यांच्या हस्ते पाटील यांचे स्वागत केले.''

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी