शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:02 IST

महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी

पुणे : मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, लोकांना मदतीची गरज आहे. बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींनी १० हजार रुपये टाकले. त्या ठिकाणी निवडणुका आहेत. म्हणून त्यांनी हे केलं. मग महाराष्ट्राला मदत का केली जात नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी अशी मागणी त्यांनी पुण्यात कार्यक्रमात केली आहे. वसंत मोरे यांच्या वतीने अजित नागरिक पतसंस्था महिला बचत गट कर्जदार महिला भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम व महिला भगिनींच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते

ठाकरे म्हणाले, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने मोदी येऊन काहीतरी घोषणा करतील. बिहारमध्ये निवडणुका असल्याने मोदींनी तिथल्या महिलाच्या खात्यात 10 हजार रुपये दिले. आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपण सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी. ज्या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी संपत आहे, त्या वेळी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. विधानसभेच्या आधी लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हफ्ते देण्यात आले. मग आता सहा महिन्यांचे हफ्त एकत्र द्या, आता पूरस्थितीमध्ये बहिणींना गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

शेतकरी कधीच कर्ज काढून पळून जात नाही

आपल्या देशातील उद्योगपतींनी हजारो कोटींचं कर्ज काढले व न फेडता ते पळून गेले. या उद्योगपतीचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. पण शेतकरी कधीच कर्ज काढून पळून जात नाही. ज्यावेळी आपण काढलेले कर्ज फेडू शकत नाही असं वाटल्यावर तो आत्महत्या करतो. अशा शेतकऱ्यांचे कर्ज मात्र माफ केलं जात नसल्याची टीका ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. 

वसंत मोरेंप्रमाणे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जा

उद्धव ठाकरेंनी भाषणात वसंत मोरे यांचे भरभरून कौतुक केले. ज्या ठिकाणी अन्याय होतो. त्या ठिकाणी वसंत तात्या हातात बांबू घेऊन जायचे आणि न्याय मिळवून द्यायचे. मुख्यमंत्री आला तरी नको, पण वसंत मोरे आले तर लोकांना आपलेपणा वाटायचा. त्यांना न्याय मिळण्याची शाश्वती वाटायची. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मदत करावी, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जावे असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Questions Modi's Bihar Aid, Asks Why Maharashtra Neglected?

Web Summary : Uddhav Thackeray criticized Modi for aiding Bihar women before Maharashtra. He demanded aid for Marathwada's flood-hit women, questioning the neglect. He highlighted farmers' plight versus industrialists' loan waivers, urging support like Vasant More.
टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBiharबिहारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार